देऊळगाव राजा येथे वटवृक्ष पूजन आणि वटवृक्ष लागवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
काल सगळीकडे सौभाग्यवती महिलांनी वटवृक्ष पूजन आनंदी वातावरणात धुमधडाक्याने साजरे केले ..भारतीय सण आणि उत्सव हे आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक मानव, पशुपक्षी, आणि निसर्गाची जोड घालून दिलेले आहेत… त्याचप्रमाणे त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन देखील दिसून येतो…. अशा ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आम्ही एक छान उपक्रम सुरू केलेला आहे… या उपक्रमामध्ये सर्व महिला सहभागी झाल्या.. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले ..तसेच सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी .रमेश कायंदे .. वन विभागातील सेवा.निवृत्त…जे .एस. डोईफोडे . विद्या वाघ मॅडम ….माजी नगराध्यक्षा मालती ताई कायंदे .. क्रांती मेरत मॅडम ..बुलढाणा जिल्हा सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षा सौ.लताताई राजपुत मॅडम ….एडवोकेट अश्विनी सावजी मॅडम… आणि ज्यांनी धरती बचाव मोहीम सुरू करून अनेक क्षेत्रातील लोकांना एकत्रितपणे आणुन एक परिवार तयार केला …. कार्यक्रमाचे सुंदर …आणि नियोजनपूर्वक आयोजन केले….. अतिशय धावपळ करून कार्यक्रम घडवुन आणला….. असे वनश्री जनाबापु मेहत्रे सर ….. आणि पूजेसाठी आलेल्या इतर महिला भगिनी….
कार्यक्रमाचा कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने आणि परिणामकारक असा हा कालचा कार्यक्रम घेण्यात आला….. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी आपले मनोगत अतिशय उत्कृष्ट रीतीने सादर केले ..त्यामध्ये ठाणेदार महाले साहेब यांनी पर्यावरण आणि विज्ञान त्याचप्रमाणे अध्यात्म याचा कसा एकमेकाशी नातं आहे …अतिशय मोलाचा संदेश दिला …. त्यांचा व्हिडिओ मी टाकत आहे ..वनविभागातील वनक्षेत्र पाल जे. एस .डोईफोडे सर यांनी वन विभागात काम करत असताना त्यांना आलेले अभ्यासपूर्ण अनुभव सर्वांसमोर सांगितले…. त्यात एक मुद्दा मनाला चटका लावून गेला… तो म्हणजे त्यांनी सांगितलं की खारुताई पर्यावरणाचे उत्कृष्ट कार्य करते….तिचं निवासस्थान झाडांवर असते…. परंतु विशेषतः वडाच्या झाडावर जास्त प्रमाणात असतं… आणि नेमकं काय होतं की ह्या दिवशी आपण महिला वटवृक्षाची पूजा करत असतांना त्या वटवृक्षाला धागा गुंडाळत असतो… अशा अनेक महिलांचे धागे गुंडाळत असतांना वटवृक्षाचे खोड बऱ्याच प्रमाणात झाकले जाते ….ज्यावेळी खार वरती चढते किंवा उतरते त्यावेळेस तिचे नखे त्या धाग्यामध्ये अडकून ती तिथेच तडफडु लागते…. आणि त्याचा फायदा शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांना म्हणजेच इतर प्राण्यांना होतो ….
मला ह्या निमित्ताने असं सांगावसं वाटतं महिला वटवृक्षाचे पूजन करत असताना धागा गुंडाळतात …आपल्या ज्या भावना आहेत… त्या धाग्याचा थोडासा गुंडाळा करून .. इतर पूजा आपण वटवृक्षाच्या बुंध्याशी ठेवतो ….त्या पुजेत धागा ठेवावा… तिला जे काही आजूबाजूला धागे मिळतात त्या धाग्याचे तुकडे करून खारुताई आपल्या पिलांना उब आणण्यासाठी उपयोग करत असते ….पर्यावरणाचे एक छोटसं कार्य आपल्यातून सहज होत.. हा संदेश एकमेकांना सगळ्यांनी द्यायला पाहिजेत.. त्याचं क्षणी आम्ही उपस्थित महिलांनी असं ठरवलं की ह्यानंतर वडाच्या झाडाला धागे न गुंडाळतात आम्ही हातामध्ये हात घालून झाडाला फेर धरला … रमेश दादा कायंदे यांनी पर्यावरणासाठी मानवाचे कार्य आजच्या रोजीला कसं गरजेचं आहे हे सांगितले.
ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य देऊळगाव राजा हायस्कूलचे सहशिक्षक अनंत तेलंग सर तसेच त्यांच्या धर्मपत्नी सौ तेलंग मॅडम यांनी एक कृतीयुक्त संदेश समाजाला दिला…. गेल्या बारा वर्षापासून ते वटवृक्षाच्या रूपाची वर्षभर जोपासना, पुजा करून वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या शेतामध्ये लावतात असे बारा वर्षापासून ची बारा वटवृक्ष त्यांच्या शेतामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात… आमच्या धरती बचाव परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला… आणि पुन्हा त्यांना पुढच्या वर्षी साठी एक वटवृक्ष भेट म्हणून देण्यात आला… मला तरी वाटतं आजच्या आधुनिक काळातील खरे सत्यवान सावित्री म्हणजे हे जोडपं.. आमच्या धरती बचाव परिवाराने देऊळगाव राजा शहरामध्ये जास्तीत जास्त वटवृक्षाचे लागवड आणि जोपासना करण्याचा संकल्प केला… त्याचप्रमाणे गावरान आंब्याची लागवड आणि जोपासना करू असा देखील एक संकल्प सर्वांनी केला.. ह्या कार्याला आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत …..खरा तो एकची धर्म सर्वांनी वृक्ष लावावे या पर्यावरण गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.