ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडाझरि पर्यटन स्थळी जाण्याकरिता रस्ता नसल्याने तलाव पाळ अपघातास कारणीभूत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुक्यातील घोडाझरि तलावात पाण्याची वाढती पातळी आणि वाढणारी पर्यटन संख्या पाहू जाता बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची बोटिंग आणि गार्डन मध्ये सोई सुविधा उपलब्ध आहेत यामुळे बाहेरून येणारे पर्यटक ह्या बाबीचा आनंद घेत असतात मात्र घोडाझरि पर्यटन स्थळी जाण्याकरिता नहराचे बाजूने रस्ता आहे पण त्यावर भगडाड पडले असल्याने पर्यटक तलाव पाळीचा आधार घेत आहे.

यामुळे तलाव परिसरात दोन वाहने रस्त्यावर जाण्याकरिता अडचण निर्माण होऊन अपघात रोखण्यासाठी तलाव पाळीव रील वाहतूक बंद करा. तसेच नहाराचे बाजूने पक्का रस्ता निर्माण करावा जेणेकरून नह राला त्याची झळ पोहचून नाली फुटण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता आहे याकरिता पाणी पुरवठा बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये