ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्या जंगली डुकराचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा – अनिल स्वामी

वनविभाग ॲक्शन मोडवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली वनपरिक्षेत्रात पिसाळलेल्या जंगली डुकराच्या हल्ल्यात एक ठार सात जणांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली त्यात बाहेरगावावरून शिक्षणासाठी ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांसह शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर डुकराने हल्ला चढविला त्यात आनंदराव चौधरी या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी पिसाळलेल्या त्या जंगली डुकराचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना केलेली आहे.

  सावली-कवठी मार्गालगत तीनकवाडी परिसरात नेहमीच वाघ व जंगली डुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि ही घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कवटी – पारडी – रुद्रापुर येथील विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रानटी डुकराच्या हल्यात जखमी झालेल्या दोन व्यक्तींना प्रत्येकी २५००० हजाराची मदत देण्यात आलेली असून उर्वरित जखमी व्यक्तींना मदत दिली जाणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

घडलेल्या घटनेच्या दिवसापासून वन विभाग ॲक्शन मोड वर असून वन विभागाचे जवळपास 100 च्या वर कर्मचाऱ्याची ३ टीम च्या माध्यमातून कवठी,पारडी, रुद्रापुर, सादागड,चारगाव, भारपायली,मानकापूर,जंगल परिसरात त्या जंगली डुकराचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरू आहे.तसेच आज चंद्रपूर येथून विशेष शिग्रदल पथक(RRU) बंदोबस्तासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली.

    तसेच शाळकरी मुलांवर हल्ला केल्यामुळे कवठी,पारडी,रुद्रापुर येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वन विभागामार्फत शाळेत ये-जा करण्याची सुविधा केलेली आहे, जोपर्यंत त्या जंगली डुकराला पकडण्यात येणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धूर्वे यांनी लोकशाही वार्ताचे तालुका प्रतिनिधी शेखर प्यारमवार यांचेशी बोलताना दिली आहे.सावली परिसरातील नागरिकांना सदर उपद्रवी रानटी डुक्कर आढळून आल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी,अशी माहिती देण्यात आली.

         मानवावर हल्ला करणाऱ्या त्या उपद्रवी रानटी डुकराला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने ३ टीम तयार करण्यात आलेल्या असून सावली परिसरातील जंगलात रवाना करण्यात आलेले आहेत.तसेच शाळकरी मुलांसाठी वनविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

           विनोद धुर्वे,वनपरीक्षेत्र अधिकारी सावली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये