ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिक्रमणधारकांचे भूखंड नियमित करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत व शहरातील नगरपरिषद हद्दीत अनेक वर्षांपासून शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहत असलेल्या रहिवाशांचे व भोगवटाधारक नागरिकांचे अतिक्रमण 2018 च्या शासन निर्णयानुसार नियमित करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

   राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा शहरात नगरपरिषद हद्दीत व ग्रामीण भागात ग्रामपंचायत हद्दीत मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून नागरिक राहत आहेत.

सदर राहत असलेली जागा शासकीय असल्याने जागेच्या आठ -अ वर भोगवटदार सरकार म्हणून नोंद असल्याने असे रहिवाशी शासनाच्या महत्त्वकांक्षी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. अतिक्रमण व भोगवटदारधारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल व तत्सम योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याने अशा नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

नगरपरिषद हद्दीतील व ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत 17 नोव्हेंबर 2018 चा शासनाचा जीआर असून तसा आदेशही झालेला आहे.शासकीय जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळावा. यासाठी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करून शासनाच्या 2018 च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,राष्ट्रवादी नेते गजानन पवार,गणेश सवडे,बबन डोके,युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड,गौरव वायाळ,ऋषिकेश वैष्णव,शिवनी अरमाळ सरपंच अनिल सोनपसारे,सतिष आरमाळ,सुनिल आरमाळ राष्ट्रवादी युवा नेते योगेशआरमाळ,दिपक राठोड शुभम वाघ रामराव शिंदे,सुभाष गुंजाळकर आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये