ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोखठोक – जिल्हातील करोडपती ८७ रेतीमाफीया “बि.पी.एल” मध्ये?

ई.डी.चौकशीची जनतेची अपेक्षा‌ - महेश पानसे

चांदा ब्लास्ट

        जिल्हयातील ५८ रेतीघाट खनिकर्म अधिकारी यांनी लिलावासाठी प्रस्तावित केले होते. तशी निवीदा प्रक्रिया सुरूही करण्यात आल्यात मात्र जिल्यातील एकाही घाटाचे लिलाव करण्यात आले नाहीत.कारण कळले नाही,यात शासनाचा करोडोचा महसूल बुडाला.घाट लिलावानंतरही रेती तस्कर,माफिया दहापट उपसा करून करोडपती झाल्याचा इतिहास जिल्याला नवीन नाही.

        जनचर्चेनुसार् जिल्ह्यात अंदाजे ८७ रेतीतस्कर करोडपती असल्याचे पुरावे शासन दरबारी असल्याचे बोलले जाते. पण या सर्वांना बी.पी. एल. यादीत बघून सारी दुनिया चक्रावली आहे.

       या माफिंयांकडे स्वताचे हायवा आहेत,जे.सि.बी.आहेत. यांच्या घरांची किंमत करोडोत असताना हे बि.पी.एल. मध्ये कसे? हा सवाल अख्या जिल्हा विचारत आहे.

सर्वात जास्त रेती माफिया स्थानीक

आमदारांचे हस्तक असल्याची चर्चा नवीन नाही.महसूल व पोलीस विभागात तक्रार करणारे व गरीब जनतेवर चौकशी करण्याची धमक जरूर असल्याचे बोलले जाते.

           जिल्हातील मूल तालुक्यातील उमानदी,अंधारीनदी ची ओरबाड रोज सुरू आहे. यातील तस्कर माजी.खासदार धानोरकर चे हस्तक होते का? किंवा मूल चा चोलर नेता याचेकडून सेटींग करीत होते की आहेत हे खूलेआम बोलले जाते.

        ज्यांना अजूनही लिहता येत नाही, शाशनाच्या योजना वाचता येत नाहीत अशा नेत्यांसह या रेती माफियांची ई. डी. चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

          यंदा लिलाव झाले नाही.तस्करांचे डबल फावले असल्याचे संपुर्ण जिल्हयात चित्र आहे. आता लिलावाची रक्कम भरायची गरज नाही वरून रान मोकळे होऊन जिल्हातील सर्व घाटांवर माफियांची बिनधास्त आंघोळ सुरू आहे. अधामधात पोलीस विभागाने काही माल व वाहणे पकडली पण ही मोहीम १ टक्यापेक्षा कमी असल्याचे बोलले जाते.

     मूल तालुक्यात ९ घाट अधिकुत आहेत.मात्रं याशिवाय वनविभागाचे अखत्यारीत असलेल्या व महसूल विभागाचे क्षेत्रात पन्नासावर नालेक्षेत्रात चांगल्या दर्जाच्या रेती ची भरमार आहे.

मूल तालुक्यातील मोठे चार ( जे जेसिबी लाऊन मूलनदी व अंधारी नदीवर रात्रभर उपसा करतात) व इतर रेतीचोर संपुर्ण तालुक्यात नालेक्षेत्रात मजूर लाऊन रात्रभर रेतीचोरी करीत असल्याचे तालुक्यात सारे जाणतात.

मात्र महसूल व पोलीस विभागाला याची अधिकुतपणे माहिती नसल्याचे कळते.

तहसिलदार मूल यांनी तपासणी पथक तयार करून नायब तहसिलदार व मंडळ अधिकारऱ्यांचे वेळापत्रक बनविले आहे .हे जरी खरे असले तरी यातीलच काही मंडळ अधिकारी या रेतीघाटात हात धुत असल्याची मोठी बोंब सुरू आहे.

काही दिवसाआधी मूल पोलिसांनी एक कार्यवाही केली होती.त्यानंतर माशी कुठे शिंकली हे शहरातील एका ‘अती डेयर्ड”रेती तस्कराला विचारल्यास कळेल.

    काही रेतीचोर भाडयाने बैलबंडया घेऊन रेतीघाटात आंघोळ करीत आहेत. तालुक्यात दिवसाकाठी २५० बैलबंडयातून रेती मूल शहरात पोहोचविला जात असल्याचे चित्त लपलेले नाही. जेसिबी लावून चक्क हायलाद्धारे व डझनभर ट्रॅक्टर द्वारे रेती साठवणूक करण्यात येत आहे.

निवडणूक आचारसंहिता संपल्यावर मोठी शासकीय कामे सुरू होतील.यात या रेतीचा पुरवठा होणार असल्याचे बोलले जात आहे.

 तपासणी पथकात पत्रकार का नकोत?

         संपुर्ण जिल्हयात व मूल तालुक्यात रेती तस्करांची गाथा असो वा केलेल्या कार्यवाहीची प्रसिद्धी असो पत्रकार पुढाकार घेतात. मेहनत घेऊन तस्करीचे चित्रण पत्रकार करतात.

तालुका स्तरावर तपासणी पथक बनविले जातात.सदर तपासणी पथक रेती घाटांमध्ये हात धुत असल्याची ओरड आहेच. या पथकांमध्ये काही जबाबदार पत्रकारांना सामील केल्यास माफियांवर वचक राहील व अधिकारी,कर्मचारी पारदर्शकतेने राष्ट्रीय संपन्नत्तीचे हनन रोखण्यात बांधील होतील असे जाणकार बोलतात. मूल एस.डी.ओ.व तहसिलदार यांनी हा पायंडा घालून चांगले पाऊल उचलावे असेही एक मत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ वचक ठेवण्यात अजूनही सक्षम असल्याचे अनेक दाखले अजूनही दिसतात ही जनसामान्यांची धारणा आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये