ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुक्यातील सर्व रेतीघाट माफियांच्या कब्ज्यात?

रेतीसाठा करण्याची स्पर्धा - सतिष राजूरवार

चांदा ब्लास्ट

        जिल्हयातील ५८ रेतीघाट खनिकर्म अधिकारी यांनी लिलावासाठी प्रस्तावित केले होते. तशी निवीदा प्रक्रिया सुरूही करण्यात आल्यात मात्र जिल्यातील एकाही घाटाचे लिलाव करण्यात आले नाहीत.कारण कळले नाही,यात शाशनाचा करोडोचा महसूल बुडाला.घाट लिलावानंतरही रेती तस्कर,माफिया दहापट उपसा करून

करोडपती झाल्याचा इतिहास जिल्याला नवीन नाही.

          यंदा लिलाव झाले नाही.तस्करांचे डबल फावले असल्याचे संपुर्ण जिल्हयात चित्र आहे. आता लिलावाची रक्कम भरायची गरज नाही वरून रान मोकळे

होऊन जिल्हातील सर्व घाटांवर माफियांची बिनधास्त आंघोळ सुरू आहे. अधामधात पोलीस विभागाने काही माल व वाहणे पकडली पण ही मोहीम १ टक्यापेक्षा कमी असल्याचे बोलले जाते.

     मूल तालुक्यात ९ घाट अधिकुत आहेत.मात्रं याशिवाय वनविभागाचे अखत्यारीत असलेल्या व महसूल विभागाचे क्षेत्रात पन्नासावर नालेक्षेत्रात चांगल्या दर्जाच्या रेती ची भरमार आहे.

मूल तालुक्यातील मोठे चार ( जे जेसिबी लाऊन मूलनदी व अंधारी नदीवर रात्रभर उपसा करतात) व इतर रेतीचोर संपुर्ण तालुक्यात नालेक्षेत्रात मजूर लाऊन रात्रभर रेतीचोरी करीत असल्याचे तालुक्यात सारे जाणतात.

मात्र महसूल व पोलीस विभागाला याची अधिकुतपणे माहिती नसल्याचे कळते.

तहसिलदार मूल यांनी तपासणी पथक तयार करून नायब तहसिलदार व मंडळ अधिकारऱ्यांचे वेळापत्रक बनविले आहे .हे जरी खरे असले तरी यातीलच काही मंडळ अधिकारी या रेतीघाटात हात धुत असल्याची मोठी बोंब सुरू आहे.

काही दिवसाआधी मूल पोलिसांनी एक कार्यवाही केली होती.त्यानंतर माशी कुठे शिंकली हे शहरातील एका ‘अती डेयर्ड”रेती तस्कराला विचारल्यास कळेल.

    काही रेतीचोर भाडयाने बैलबंडया घेऊन रेतीघाटात आंघोळ करीत आहेत. तालुक्यात दिवसाकाठी २५० बैलबंडयातून रेती मूल शहरात पोहोचविला जात असल्याचे चित्त लपलेले नाही. जेसिबी लावून चक्क हायलाद्धारे व डझनभर ट्रॅक्टर द्धारे रेती साठवणूक करण्यात येत आहे.

निवडणूक आचारसंहिता संपल्यावर मोठी शाशकीय कामे सुरू होतील.यात या रेतीचा पुरवठा होणार असल्याचे बोलले जात आहे.

मूल येथे लोकसभा निवडणुकीआधी रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी भगत साहेब यांनी दोन दिवसाआधीच गोंडपिपरी तालुक्यालगतच्या क्षेत्रात २ हायवा पकडल्या होत्या. मूल उपविभागात मूल,सावली व पोंभुर्णा तालुके येतात.

    मूल तालुक्यातील रेती चोरांना सारा मूल परिसर जाणतो.यांना आवरून मोठया राष्ट्रीय संपत्तीचे हनन थांबविता येईल असे बोलले जाते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये