जिल्हा परिषद शिक्षकांचे बदल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धिंडवडे
परीक्षा नाममात्र
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांचे बदली झाल्याने विद्यार्थीचा शिक्षणाचा खेळ -खंडोबा होतं असून ज्ञानार्जन मिळण्यापेक्षा शिक्षणापासून परावृत्त ठेवण्याचा प्रकार बदली करून शासन करीत असल्याचा आरोप संघटनाचे वतीने करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेने बदल्या करताना पती -पत्नी, दुर्धर आजार यांचा आधार घेत बदल्या केल्यात यात काहींनी दुर्गम भागात सेवा करूनही त्याच्या बदल्या केल्या मात्र काही शिक्षक संघटनानी बदल्या करताना जुन्या शिक्षकांचे अर्ज यांचा विचार न करता सरसकट बदल्या करून कार्यरत शिक्षकांना अचानक बदली करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययन -अध्यापन यापासून दूर सारून अन्याय करण्याचा प्रकार जिल्हा परिषद चंद्रपूर येथील प्रशासनाने चालवीला आहे.
यामुळे विविध संघटना आक्रमक झाल्या असल्या तरी सध्यातरी न्याय मिळेल याकरिता संघटना शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.