चांदा पब्लिक स्कूल येथे एड्यू-फिस्ट २K२४ चा समारोपीय सोहळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
शिक्षण हे उन्नतीचे एकमेव साधन होय. विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळविण्यासाठी उत्तम शिक्षण आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच आपले व्यक्तीमत्व घडविण्यास मदत होते तर शालेय शिक्षण आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावते. हे जिवन प्रगल्भीत व संस्कारीत व्हावं याकरिता यांदा पब्लिक स्कूल येथे एड्यू-फिस्ट २K२४ चे आयोजन करण्यात आले. याचा समारोपिय सोहळा रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
एड्यू-फिस्ट २K२४ च्या अंतर्गत भरविण्यात आलेल्या दहा दिवसीय कार्यक्रमात, सांस्कृतीक, गणितीय, वैज्ञानिक, साहित्यीक अशा वैविध्यपूर्ण शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन केल्या गेले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनासोबतच ‘गगन सदन’ या प्रार्थनेने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे मननिय सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. विजय पणशीकर, संपादक, हितवाद वृत्तपत्र, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे, तर चंद्रपूरातील नामवंत मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत विविध समुह नृत्याचे तर रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारे नृत्य सादर करण्यात आले.
एकपात्री अभिनय, पथनाट्य, बडबडगीते, पोवाडा, म्हणींवर आधारित गोष्ट, मुकाभिनय, बालनाट्य इत्यादी नाविण्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आले. पार पडलेल्या आठ दिवसीय सोहळ्यातील क्षणचित्रे व विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाचा अहवाल विद्यार्थीनी मैत्री मेश्राम, नाविण्या बत्तुलवार, धृव मुंगुले व सृष्टी जाधव यांनी सादर केला.
एड्यू-फिस्ट २K२४ च्या बेस्ट हाऊसचा सन्मान महर्षी चरक हाऊस – हाऊस प्रमुख शिखा दुबे, बेस्ट हाऊस मास्टर तबस्सूम खान यांना देण्यात आला तर, बेस्ट इव्हेंट इन्चार्ज फहिम शेख, स्टूडन्ट ऑफ द इयर मैत्री मेश्राम व सुमीरन सहारे यांना देखील गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुधाकर अडबाले यांनी आपल्या व्यक्तव्यात म्हटले की, तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असेल तर स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा कारण भारतीय संस्कृती जपणारी शाळा म्हणजे चांदा पब्लिक स्कूल होय, या शब्दात शाळेचा गौरव केला.
सन्माननिय विजय पणशीकर यांनी मुलांना विविध प्रकारची पुस्तक वाचायला लावा. तुम्ही सुद्धा मुलांसमोर पुस्तक वाचा तर मुलांना मोबाईलपासून दुर ठेवा, असे तक्तव्य केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी प्रत्येक विद्यार्थी हा अद्वितीय व प्रतिभाशाली असतो. म्हणूनच त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच सर्वांगिण ज्ञानाची आवश्यकता असते. शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांस जिवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे शिक्षण देतो. पालकांनी आपल्या पाल्यांना नेहमी पाठींबा द्या तेव्हाच ते यशस्वी होतील असे वक्तव्य केले.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. परिश्रमाची साथ सोडू नका कारण यश हे परिश्रमाच्या मागे लपलेले असते, असे वक्तव्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षिका सौ. निलीमा पाऊनकर व विद्यार्थ्यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक महेश गौरकार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा या करिता विभाग प्रमुख वंदना बोरसरे, स्मृती मून, शिल्पा खांडरे, झेबा जाकिर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या आठ दिवसीय सोहळ्यात पालकांचे सहकार्य देखील मोलाचे ठरले.