देऊळगाव राजा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उद्भवली पाणी टंचाई
19 गावासाठी 31 विहिरीचे अधिग्रहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
तीन गावांची मदार टँकरवर ; मागील वर्षातील 33 लाखाचेवर अनुदान थकले चालू वर्षाची दमडी सुद्धा नाही
देऊळगाव राजा तालुक्यात उन्हाळ्याच्या तोंडावर भीषण पाणी टंचाईचे चावट उद्भवले असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र ठोस उपाययोजना करताना दिसत नाही विहिरी आणि छोट्या मोठ्या कोरडे पडले असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे भीषण सावट तालुक्यावर उद्भवले आहे तर तालुक्यामध्ये 19 गावांसाठी 31 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून तीन गावांसाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहे खेदाची बाब म्हणजे मागील वर्षात विहीर अधिग्रहण केलेल्या अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही तब्बल 33 लाख 54 हजार 600 रुपये शासनाकडे थकीत असून चालू वर्षातील एक रुपया सुद्धा विहीर अधिग्रहण केलेला मालकांना मिळालेल्या नाही त्यामुळे विहीर अधिग्रहण केलेल्या मालका मध्ये शासन प्रणाली विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात सर्वात मोठे जल स्त्रोत म्हणजे संत चोखासागर (खडकपूर्णा धरण) परंतु धरण क्षेत्रात पाऊस पडलेला नसल्यामुळे सदर धरण हे अतिशय कोरडे टाक पडले असून त्यामध्ये पर्जन्यमान कमी स्वरूपात असल्यामुळे सदर धरणामध्ये पाण्याचा फक्त मृत पाणी साठा राहिल्याने भर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दिवसांमध्ये तालुक्यावर पाणीटंचाईचे तीव्र सावट उभे ठाकले आहे
तालुक्यातील एकूण 62 गावांसाठी 40 ग्रामपंचायती आहेत यामध्ये गट ग्रामपंचायतचा सुद्धा समावेश आहे त्यातील तीव्र पाणीटंचाई असलेल्या 19 गावांसाठी 33 विहिरीचे अधिग्रहण शासनाकडून करण्यात आले आहे तर तालुक्यातील तीन गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून चार गावांचा टँकर चा प्रस्ताव प्रस्तावित असल्याची माहिती पाणी टंचाई कक्षा कडून प्राप्त झाली आहे परंतु याची पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने भविष्यात आणखी वेळ अधिग्रहण करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
विहिरीत च नाही तर पोहऱ्यात कुठून येणार
गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान हे अतिशय अल्प प्रमाणात झाले असून गतवर्षी तुलनेत पर्जन्यमान हे अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळे हिवाळ्यामध्ये तालुक्यातील छोटे मोठे धरण तलाव पडले होते तेव्हापासूनच उद्भवणाऱ्या पाणीटंचाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक होते परंतु लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले गेले नाही आश्वासनाशिवाय कसल्याही प्रकारची कार्यवाही लोकप्रतिनिधीकडून होताना दिसत नाही अत्यल्प प्रजन्यमानामुळे ग्रामीण पातळीवरील ओढे नाले हे कोरडे टाक पडले आणि पर्यायाने छोटे मोठे बंधारे आणि गाव पातळीवरील तलाव काही ठिकाणी कोरडे पडले असून काही ठिकाणी मोठ्या धरणांमध्ये पाण्याचा मृत साठा उपलब्ध आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये पाणीटंचाई संदर्भात ठोस उपाययोजना केल्या नाही तर पाणीटंचाईचे सावट हे तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही भीषणता अधिक दहाक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे विहिरीमध्ये आणि इतर जलस्त्रोतांमध्ये पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शासन स्तरावर विहिरीचे अधिग्रहण जरी केले तर त्यात पाणीच नसल्याने काय करणार असा प्रश्न सुद्धा जनतेसमोर तसेच प्रशासना समोर उभा ठाकला आहे
विहीर अधिग्रहण केल्या परंतु विहीर मालकाला मोबदला केव्हा देणार?
उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील पाणीटंचाईचे तीव्र स्वरूप पाहता 35 विहिरीचे अधिग्रहण शासन स्तरावरून करण्यात आले होते त्यातील आठ विहिरी काही कारणामुळे बंद करण्यात आल्या असल्या तरी आज रोजी 19 गावांसाठी31 विहीर अधिग्रहण चालू आहे ग्राम पातळीवर शेतकरी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पिकांना पाणी न देता ग्राम पातळीवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला विहीर अधिग्रहण करून देण्यासाठी सहकार्यकर्ता परंतु चालू वर्षांमध्ये एक रुपया सुद्धा निधी संबंधित विहीर मालकांना वाटप करण्यात आला नाही तर मागील वर्षातील विहीर अधिग्रहण अनुदान शासनाकडे 33 लाख 54 हजार 600 रुपये प्रलंबित असल्याने तीन वर्षातील तर नाहीत परंतु चालू वर्षातील एक दमडी सुद्धा विहीर मालकांना मिळालेली नाही अधिग्रहण केलेल्या विहीर मालकांना प्रतिदिन 600 रुपये प्रमाणे मोबदला मिळत असतो. आम्ही आमच्या शेत मालाचे पाणी देण्याचे सोडून विहीर अधिग्रणासाठी होकार दिला त्याचा मोबदला तरी आम्हाला प्रशासकीय पातळीवरून योग्य वेळी देण्यात यावा अशी रास्त भावना संबंधित विहीर मालकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यामध्ये पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ग्राम पातळीवरून विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला तात्काळ मंजुरात देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो विहीर अधिग्रहण मोबदला मिळण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा करत असून शासन स्तरावर मोबदला उपलब्ध झाल्या नंतर लगेच विहीर मालकाला त्याचा मोबदला देण्यात येईल.
व्ही.आर.सावळे
पाणीटंचाई कक्ष प्रमुख पंचायत समिती देऊळगाव राजा
भागातील शेतकरी आजही माणुसकी जोपासत असून विहीर अधिग्रणासाठी गाव पातळीवर त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवल्याबरोबर ते त्यास होकार देतात परंतु आपल्या विहिरीमध्ये उपलब्ध असलेले पाणी ते स्वतःच्या पिकांना न देता गाव पातळीवर अधिग्रहण केल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी देतात त्यांचा मोबदला सुद्धा शासन स्तरावरून त्यांना वेळेत देण्यात यावा यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून तो लवकर कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे तसेच तालुक्यात भविष्यात उद्भवणारे पाणीटंचाई यासाठी सुद्धा शासन स्तरावरून तसेच लोकप्रतिनिधींनी ठोस उपाय योजना प्रस्तावित करणे आवश्यक आहे.
डॉक्टर रामप्रसाद शेळके