महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन
मागण्या पूर्ण न झाल्यास ५ मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्य भर कंत्राटी कामगारांचे आंदोलनाचे वारे पेटलेले चित्र दिसून येत आहेत.अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार शासन दरबारी आपल्या मागण्यासाठी अनेक आंदोलने पत्रव्यवहार करुन सुध्दा शासन व प्रशासन कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुर्ण करण्यास दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील ३० संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती मार्फत तिन्ही कंपनीतील कामगारांच्या प्रमुख मागण्यामध्ये पगार वाढ व (एन एम आर ) नॉमिनल मस्टर रोल पद्धती ने कामगारांना कंपनीत सामावून घेणे हरियाणा पॅटर्न प्रमाणे कंत्राटदार मुक्त रोजगार व अन्य १७ मागण्या करीता राज्यभरात सहा टप्प्यांमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे.त्यामध्ये पहिला टप्पा ९ फेब्रुवारी पासून सुरू झाला व पाचवा टप्पा २८ फेब्रुवारी च्या मध्यरात्री पासून २९ फेब्रुवारी च्या मध्यरात्री पर्यंत ४८ तास काम बंद धरणे आंदोलन ८५ टक्के यशस्वी झाले आहे.
तसेच अद्याप संपात सहभागी न झालेल्या कंत्राटी कामगारांना संयुक्त कृती समिती चंद्रपूर कडून आवाहन करण्यात येत आहे की आपल्या न्याय हक्काच्या १७ मागण्या संदर्भात आंदोलनात सामिल झालेल्या संपूर्ण कंत्राटी कामगारांचे संयुक्त कृती समिती ने संपूर्ण कंत्राटी कामगारांचे आभार मानले व शासन,प्रशासन यांनी मागण्या पूर्ण न केल्यास येत्या ५ मार्च रोजी बेमुदत काम बंद आंदोलना चा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.