ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

335 ग्रामीण महिलांनी केपीसीएल कंपनीचे उत्पादन आणि कोळसा वाहतूक बंद केली

ग्रामपंचायत बरांजने ग्रामसभेत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय ; उपोषणाचा ४१ वा दिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 41 वा दिवस असून, उत्पादन आणि वाहतूक दोन्ही ठप्प झाले आहेत.

 बरांज मोकासा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत एकमुखी ठराव संमत करून केपीसीएलचे कोळसा उत्पादन व वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उपोषणाला बसलेल्या महिलेसह ग्रामस्थांसह काम बंद पाडण्यात आले.

 केपीसीएल कंपनीने प्रत्येक घरातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी द्यावी, गावाला 1269 रुपये घरांची भरपाई द्यावी आणि सर्वांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी 335 ग्रामीण महिला उपोषणाला बसल्या आहेत.

 केपीसीएल कोल प्रोडक्ट्स कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यांना नुकसानभरपाई दिली नाही किंवा त्यांचे पुनर्वसनही केले नाही. बरांज मोकासा येथे राहणाऱ्या शेकडो घरांवर कब्जा करून कोळसा उत्पादन सुरू केले आहे.

 जिल्हादंडाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलीस प्रशासनाचीही कंपनीशी मिलीभगत आहे.

 न्यायासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

 त्यामुळे ग्रामस्थांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

 केपीसीएलने आंदोलकांवर दबाव आणण्यासाठी पोलिस प्रशासनाला बोलावले आहे. मात्र तुरुंगात जावे पण कंपनी चालू देणार नाही अशी भूमिका ग्रामीण महिलांनी घेतली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये