ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘विदयुत प्रवाहामुळे मानव व वन्यजीव मृत्यू प्रतिबंध विषयावर, एक दिवसिय कार्यशाळा संपन्न

जनतेने महावितरणला व वनविभागाला सहकार्य करावे - मुख्य अभियंता सुनिल देशपांडे

चांदा ब्लास्ट

महावितरण चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर जिल्हा व्याघ्र् संवर्धन कक्ष तथा वनविभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त ‘विदयुत प्रवाहामुळे मानव व वन्यजीव मृत्यू प्रतिबंध विषयावर’, स्थानिक फॉरेस्ट अकॅडमी येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत वरीष्ठ तथा कनिष्ठ वनाधिकारी तसेच महावितरणचे वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे, श्री. नितीन देसाई(डब्लु पी एस आय), मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अधिक्षक अभियंता श्रीमती. संध्या चिवंडे, चंद्रपूर मंडळ महावितरण, मिलन वैष्णव. सहा. विदयुत निरिक्षक, विदयुत निरिक्षक कार्यालय चंद्रपूर, बंडू धोत्रे, अध्यक्ष, पर्यावरण संस्था इको-प्रो तथा भारतीय वन्यजीव कार्यकर्ते तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर, चंद्रपूर विभाग, अतिरीक्त कार्यकारी अभियंता सुहास पडोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

     या यांप्रसंगी बोलतांना महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी महावितरणद्वारा वनविभागास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महावितरणद्वारा महावितरण व वनविभाग समन्वय साधून संयुक्त गस्ती पथकांच्या माध्यमातून संशयित भागात गस्त घालण्यात येतील व याकामी संयुक्त समिती स्थापण्यात येईल, तसेच स्वच्छ वातावरण असुन पण ज्या विजवाहिणीवर वारंवार ट्रिपिंग होत असेल. तर वनविभागाला लगेच कळवण्यात येईल व इंटेलिजन्स पुरवण्यात येईल, असे सांगितले. यात जनतेचा सहभागही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. त्यामुळे, यात जनतेने महावितरणला व वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

     नितीन देसाई(डब्लु पी एस आय) यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातुन भारतात इतर ठिकाणी तसेच महाराष्ट्रात विशेषत: पुर्व विदर्भातील वनक्षेत्रात वाढत असलेल्या वन्य जिवीतांच्या अवैध शिकारी तसेच शिकारकर्त्यांची, शिकार साधण्यास व विल्हेवाट लावण्यात वापरण्यात येणारी वॉटस अप प्रणाली, शिकारी करीता अवलंबली जाणारी कार्य पध्दती इत्यादी चे विस्तृत सादरीकरण केले.

    रामगांवकर यांनी वनरक्षक, वनपाल संबंधित सर्व वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी गस्त वाढविण्याचे आवाहन केले तथा मिलन वैष्णव यांनी, शिकार प्रकरणात भांदवी व वनकायद्यात असलेल्या कलम याबाबत सविस्तर माहिती दिली.

  याप्रसंगी महावितरणचे अभियंता व वनविभागाचे अधिकारी यांनी अशा प्रकरणात त्यांना आलेले व त्यांनी भूतकाळात खुंटया गाडून तसेच इतर प्रकारे होणारे शिकारीचे प्रयत्न हानूण पाडल्याचे अनुभव कथन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये