शासनाने धान खरेदी केला? पण शेतकऱ्याचे चुकारे कधी मिळणार.
शासनाने त्वरित धान शेतकऱ्याचे चुकारे द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्यात मोठया प्रमाणात धान खरेदी आधारभूत किंमतीनुसार ऑनलाईन पद्धतीने अनेक संस्थानी खरेदी केले. शासनाने धान खरेदी विक्री करून बोनस मिळणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी १५जानेवारी पर्यंत आपलें ऑनलाईन फॉर्म भरून ३०जानेवारी पर्यंत खरेदी करण्याचे शासनाचे धोरण आहे मात्र सुरुवातीला जे धान खरेदी केले त्याचे शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी चातकासारखी पैसे येईल म्हणून वारमावर फेडरेशन कडे चकरा मारत आहे पण मायबाप सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून मोठंमोठया घोषणा करीत आहे.
शेतकरी बळीराजा या ना त्या कारणाने अडचणीत सापडला असून त्याला शासनाने वेळीच मदत केली तर शेतकरी सुखी होईल मात्र तसे होताना दिसत नाही अजूनही शेतकऱ्याला अवकाळी पावसाने झालेले नुकसान मिळाले नाही. धान शेतकऱ्याला बोनस जाहीर केला पण त्याचा कुठेच पत्ता दिसत नाही यामुळे शेतकरी बळीराजा मेळकुटीला आला असून संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित धान शेतकऱ्याचे चुकारे द्यावे अशी शेतकरी मागणी करू लागला असल्याचे दिसून येत आहे.