ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या अष्टमी मुंडेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स ची बी.एस्सी भाग एक ची विद्यार्थिनी कु. अष्टमी मुंडे हिने कर्मवीर महाविद्यालय मूल येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 10 जानेवारीला या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला, त्यात कू. अष्टमी केंद्रे हिने लिहिलेल्या भारतातील लोकशाही आणि प्रसार माध्यमांची भूमिका या निबंधाला प्रथम पारितोषिक व रू.2000 बक्षीस प्राप्त झाले.

त्याचप्रमाणे समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय या वादविवाद स्पर्धेतही अष्टमी ने भाग घेतला. विरुद्ध बाजूने बाजू मांडून द्वितीय क्रमांक पटकावला, त्यात तिला रू.1000 बक्षीस प्राप्त झाले. बक्षीस वितरण करतेवेळी महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव व विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा उपस्थित होते. अष्टमीच्या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये