ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलजिवन योजनेचा फज्जा

खैरगाव ग्रा.प क्षेत्रात पाण्याचा हाहाकार सरपंच सचिवाची निष्क्रीयता ?      

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हातलोणी कुकुडबोडी भरकीगुडाया ठिकाणी एका विहिरीवरून पाण्याची सुविधा करण्यात आली होती या ग्रामपंचायतक्षेत्रातील यापूर्वी जल स्वराज योजनेतूनपाण्याच्या जलकुंभाचेकाम करण्यात आले होते ते जिर्ण झाले ते पाणी थेंब थेंब गळत असताना याच गावात पूर्वी लाखो रुपये खर्च करून योजना फसली लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही.

नव्याने या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या हात लोणी कुकुटबोडी भरकी गुडाया ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत 2022 मध्ये योजना मंजूर झाली योजनेसाठी निधी देखील मंजूर करण्यात आले कामाचा आराखडा अंदाजपत्रक तयार करून कंत्रटदार म्हणून आसुटकर या ठेकेदाराकडे काम देण्यात आले या कामाचा कालावधी 16 महिन्याचा होता 16 महिन्यात या ठिकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर झालेली कामे पूर्ण झालेली नाही.

जनावरांसाठी जलकुंभाचे बांधकाम करण्यात आलेले नाही पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नळ जोडणी चेकाम देखील निकृष्ट झालेले आहे भरकीगुळा या ठिकाणीजलकुंभ अर्धवट असून काम पूर्ण करण्यात आलेले नाही सध्या कुक्कुटबोडी येथील विहिरीवरून पाण्याची सोय करण्यात आली परंतु पाईप लाईन तुटले टाकीमध्ये पाणी न भरणे तसेच पाणी नियमित गावकऱ्यांना उपलब्ध न होणे यामुळे पाण्यासाठी हाहाकार गावात माजला असून गावकऱ्यांना बंडी बैलाने पाणी आणण्याची पाळी आलेली आहे.

ग्रामपंचायत सरपंच रोशन मरापे सचिव देवानंद उईके यांच्या लहरी कारभाराने गावकरी त्रस्त असून मनमानी चालवीत हम करे सो कायदा अशा पद्धतीने दोघांची वागणूक असल्यामुळे लोकांची वेळेवर कामे होत नाही तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून सरपंच सचिवांचे पाणी टंचाईकडे कोणतेही लक्ष नाही यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून या गावातील नळ योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे कामे झाली नसताना सचिव व सरपंचांनी कामे पूर्ण झाल्याचे भास होऊन कामापेक्षा अधिकचे देयके कंत्रटदाराला देण्यामध्ये हातभार लावला आहे त्यामुळे गावातील एप्रिल महिन्यामध्ये तीव्र उन्हाचे चटके व भूगर्भात पाणीपातळी खालावली आहे खैरगाव ग्रा.प पेसा क्षेत्रात असून संरपच व सचिवानी मनमानी कारभार करत घाटराई हातलोणी नाल्यावरील रेती मुरूम दगड उत्खनन प्रदूषण नियंत्रण व भुजल विभागाचे कोणतेही नाहरकत न घेता जि आर आय एल कंपनीला नाहरकत देऊन नियम बाह्य उत्खनन केल्याने गावातील विहरी कृपनलिका तळ गाठला आहे या उत्खनन नियम बाह्य झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यानी केला असून जलजिवन मिशन योजनेच्या झालेल्या खर्चाची व गैरव्यवहारची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये