ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिमायतनगर येथील कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

संघर्ष हाच पर्याय - ॲड. वामनराव चटप

चांदा ब्लास्ट

जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील कांग्रेस, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावून सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जि.प.माजी समाजकल्याण सभापती निलकंठराव कोरांगे, नरसिंग हामने, देवीदास वारे, मधु चिंचोलकर, सुदर्शन शेबादे उपस्थित होते.
              या कार्यक्रमात लहू भूते, रमेश वाघमारे, बबरुवान वाघमारे, भारत जाधव, पांडुरंग डावले, प्रवीण गवाले, लक्ष्मण भूते, सचिन काकडे, शरीफ शेख, बसीर पठान, दत्ता वाघमारे, मारोती फंड, काशीनाथ इंचले, चीकूरे मामा, खंडू कसार, शेख खमरुद्दीन इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
            कार्यक्रमात बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, राज्यकर्त्ये शेतक-यांना न्याय देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि दुस-या बाजूला विरोधी पक्षही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे लावून धरत नाही. विदर्भात दरवर्षी अधिवेशन होऊनही विदर्भाच्या वाट्याला काही येत नाही, हे दुर्दैव आहे. आता संघर्ष हाच एकमेव मार्ग असून गावागावात शेतकरी जागृत होऊन शेतकरी संघटनेत प्रवेश करीत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे मत ॲड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये