अवकाळी पावसाने मोडले शेतक ऱ्याचे कंबर्डे
शेतकरी हवालदिल * *ख़रीपाच्या हंगामात यंदाहि दुष्काळाचे सावट
चांदा ब्लास्ट: (प्रा.शेखर प्यारमवार )
बदलत्या वातावर्णामुळे जिल्ह्यासःह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकासह ईतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकरी राजा भयभीत झाला असून पुन्हा एकदा दुष्काळाचा अंदाज वर्तविल्या जात आहे शेतात असलेले पुंजने , सर्ड्या सह तुळीची आज रोजी आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे मत शेतक ऱ्या कडून वर्तविला जात असून यंदा ख़रीपाचे मोठे नुकसान होत आहे नेहमीची ही परिस्थिति यंदाच्या हंगामा दरम्यान शेतक ऱ्याचे कंबर्डे मोङन्यासरखी असून ओ ल्या दुष्काळाची शक्याता वर्तविली जात आहे यंदाचा खरीप हंगाम उशिरा सुरु झाला असताना शेतक ऱ्यानी कोणतीही पर्वा न करता धान पिकाची रोवनी केलि उशिरा येणारा पाऊस उशिरा पर्यन्त साथ देईल अशी आशा होती मात्र पावसाने दाड़ी मारली परिणामी गोसे अंतर्गत ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावाच्या माध्यमातून धानपिकाची रोवनी संपली धनपिक उभे झाले मात्र सततच्या दमट वातावनामुळे धानपिकावर रोग़ाचे सावट निर्माण झाले अनेक महागाडी किटक नाशके फवारुम सुधा रोग़ावर नियंत्रण आनने कठिन झाले धानाची गर्भावस्था पासून सातत्याने रोगाचा प्रादुर्भाव कायम होता परिणामी धान पिक कापनिला आणि हाती आल्याणतर नेहमी प्रमाणे अवकाळी पावसाने सुरुवात केली आजच्या घडिला शेतकऱ्याच्या धनपिकाची कापनी झाली सर्ड्या बाँधावर पुंजने उभे असताना पावसाने सुरुवात केल्याने यंदाच्या ख़रीपातही शेतक ऱ्याचे मोठे नुक़सान होताना दिसते अवकाळी पावसाने होत असलेल्या शेतक ऱ्या धानपिकाची होत असलेली नुकसान लक्ष्यात घेता त्याचा पंचनामा करुण त्वरित मदत करावी अशी मागणी शेतक ऱ्या कडून केलि जात असली तरी दमट वातावर्णामुळे पावसाचा अंदाज पुढेहि वर्तविल्या जात असून अवकाळी पावसामुळे पुंजने ,सर्ड्या, तूळ ,पराटी, आदि पिकांची मोठी नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे परिणामी शेताच्या बाँधावर टाकलेले धानपिकाचे पुंजने पाण्याने खराब होऊ नये म्हणून अनेक शेतक ऱ्यानी पुंजन्याच्या सुरक्षितेसाठी पालीथिन, त्रिफ़ाला आदिच्या उपयोग केल्याचे दिसुन येत आहे म्हणजे विशेष यांदाचा साधलेला ख़रीपाचा हंगाम अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा दुष्काळाची परिस्थिति निर्माण करणारा ठरत असल्याने शेतकरी राजा चिंतातुर झाल्याचे दिसत असले तरी बदलत्या वातावरणाचा जोर कायम आहे परिणामी धान कापनी बांधनी आणि चुरण्यावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे पेरणी योग्य ख़रीपाच्या भैगोलिक २८४५६ क्षेत्रा पैकी यंदा २५७६७ हजार हेक्टर धान पिक , तुळ ८५३ हेक्टर ,कापूस ८१३ हेक्टर अशी लागवड केलि असल्याचि कृषि विभागाची माहिती आहे …..
………………………………
मायबाप सरकार लक्ष द्या हो…..
दुस ऱ्याचे पोट भरन्यासाठी स्वता कष्ट करुण शेती पिकविनारा ..एक दान्यापासुन हजार दाने निर्माण करणारा माझे मायबाप शेतकरी बांधव आज मात्र निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे हतबल झाला आहे त्याला कोन आधार देईल या आशेने वाट बघत आहे सर्व शेतात धान कापुन आहे,सर्ड्या भीजत आहे,कापूस ओला होत आहे,तुळीचा बार झडत आहे त्यामुळे शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होताना दिसते याकडे मायबाप सरकार लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे ….
शेतकरी
किशोर घोटेकार सिंदोळा
………………………………
यंदाच्या ख़रीपात ईतही पिकाच्या लगवडित झाली वाढ ……
खरीप हंगामासाठी पेरणी योग्य क्षेत्र २८४५६ हेक्टर भौगोलीक क्षेत्रापैकी यंदा २५७६७ हजार हेक्टर धान, तुळ ८५३ हेक्टर,कापूस८१३ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड केलि असल्याची कृषि विभागाची माहिती आहे त्यामुळे यंदाच्या ख़रीपात धाना सह इतरही पिकात वाढ झाल्याचे कृषि विभाग अंदाजा नुसार दिसते..
………………………………