कोची येथे रा.से.यो. शिबिराचे थाटात उद्घाटन
मानवाने आपल्या आयुष्यात जमेल तेवढी मदत इतरांना करत मानवता धर्म पाळावा : महेंद्र भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूसच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा श्रम संस्कार शिबिर दि. 3 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीसाठी भद्रावती तालुक्यातील कोची या गावात ‘माझा विकसित भारत, डिजिटल साक्षरता व ग्रामोन्नती करिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या शिबिरात बौद्धिक, संविधान रॅली, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन आज कोची गावात संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटनीय अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी केले.
उद्घाटक म्हणून राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. डॉ. रवी धारपवार यांनी स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना डिजिटल साक्षरता व स्किल इंडिया बाबत माहिती देऊन त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करून देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी असलेले घोनाड (कोची) ग्रामपंचायतचे सरपंच मा. महेंद्रजी भोयर यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत, मानवाने आपल्या आयुष्यात जमेल तेवढी मदत इतरांना करत मानवता धर्म पाळला पाहिजे. असे सांगितले.
तर कोची येथील पोलीस पाटील सौ. मनीषा बारतीने यांनी विद्यार्थ्यांना समायोचीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ व अन्य पाहुणे उपस्थित होते. प्रा. मंगेश जमदाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व उद्देश पटवून सांगितले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा. माननीय जगदीश डाहूले, मुख्याध्यापक श्री शंकरजी नळे, ग्रामसेवक श्री राजेंद्र अवघड, शिक्षिका माधुरी चिंचोलकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. महेंद्र कुंभारे यांनी केले. तर आभार डॉ. माधव कांडणगिरे यांनी मानले.