ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विद्यार्थिनींचा खैरगावात प्रवेश : शेतकऱ्यांसोबत शेतीच्या नव्या वाटा

दोन महिने शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती तालुक्यातील खैरगाव येथे आनंद निकेतन कृषी महाविद्‌यालय येथील सातव्या सत्रातील वि‌द्यार्थिनी ग्रामीण शेती अनुभव कार्यक्रमांतर्गत खैरगावात दाखल झाल्याबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये कृषी विद्यार्थिनी प्रणाली बेद्रे, नोमिका बारसागडे, दिक्षा भगत, प्राजक्ता रामटेके, संस्कृती बारब्दे, श्रुती राऊत, श्रद्धा आत्राम यांचा समावेश असून या दोन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणार आहेत. गावातील शेतकयांसोबत प्रत्यक्ष काम करून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहीती देतील.

या विद्यार्थिनी शेतीतील विविध प्रात्याक्षिके दाखविणार आहेत, यात माती व पाणी परिक्षण, विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य खत व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण, सेंद्रिय शेतीचा प्रचार, सुधारित बियाणांचा वापर, जनावरांची काळजी व संगोपन इ. बाबींवर मार्गदर्शन करतील. या प्रसंगी सरपंच संदिप दडमल व उपसरपंच रमेश पावडे, ग्राममसेवक व ग्रामस्त उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्‌यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासजी पोतदार सर , रावे प्रमुख डॉ.रामचंद्रजी महाजन सर,कार्यक्रम अधिकारी डॉ. सतिशजी इमडे सर, कार्यक्रम समन्वय डॉ. राहुलजी तायडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व तसेच विद्यार्थिनींना पारंपारिक ज्ञान देण्याकरिता शेतकरी शंकर कुरेकार, वसंता वाकडे, अरुण जोगी, विठ्ठल जोगी. दिलीप गायकवाड, सविता छत्रगुन नन्नावरे आणि मनोहर वाकडे यांची निवड करण्यात आली.

आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला, गावकऱ्यांच्या स्वागतामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत, असे एका विद्यार्थिनींने सांगितले. गावातील उपसरपंच रमेश पावडे म्हणाले, आमचे शेतकरी शिकण्यास उत्सुक आहेत, या उपक्रमामुळे नक्कीच उत्पादनात वाढ होईल आणि गावात कृषिविषयक प्रगतीस हातभार लागेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये