ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी लेखक-कलावंतांनी उपेक्षितांची वेदना मांडावी

पालकमंत्री डॉ. अशोक उईके : जिल्हा बँक सभागृहात ‘गोंडवाना : स्वरूप व वास्तव’ ग्रंथाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : आदिवासी समाजाची स्थिती सुधारण्याच्या टप्प्यावर असली तरी, पुढचा काळ कठीण होऊ शकतो. त्यामुळे आदिवासी लेखकांनी व सुशिक्षितांनी केवळ समाज माध्यमांमधून नकारात्मक टीका टिपणीत वेळ न घालवता तळागाळातील उपेक्षितांची वेदना मांडावी. समाजाचा घटक म्हणून मीही कर्तव्यापासून दूर नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी केले.

उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने प्रब्रह्मानंद मडावी लिखित ‘गोंडवाना : स्वरूप व वास्तव’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्यात शनिवारी (दि. १०) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी बोली भाषांचे अभ्यासक राजेश मडावी तर, विशेष अतिथी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, मेडिकल कॉलेजच्या क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. शारदा टेकाम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर, प्रभा मडावी व लेखक प्रब्रह्मानंद मडावी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, विज्ञान विषयाचा प्राध्यापक म्हणून ३२ वर्षे अध्यापन केले. पीएचडीधारकांनाही मार्गदर्शन केले. मात्र, कधी ग्रंथ लिहू शकलो नाही. संशोधनपर पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित होणे, यापेक्षा मला दूसरा मोठा आनंद नाही. युवापिढीने वाचन संस्कृतीपासून दूर जाऊ नये,असे आवाहनही त्यांनी केले. समाज कल्याण अधिकारी साळवे, डॉ. टेकाम यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष मडावी यांनी ग्रंथाची वैशिष्ट्ये व मौलिकत्व विशद केले. प्रास्ताविक अरविंद मसराम, संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. प्रभा मडावी यांनी मानले.

सेवाभावींचा सत्कार

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार झाला. यात डॉ. कपिल गेडाम (वैद्यकीय), भारत सलाम (चित्रकार), संजय राजगडे (संगीत), सुमेध पेंदोर (क्रीडा) कपिल तिरणकर, शुभम मडावी (उद्योजक), कविता कुमरे (एमपीएससी उत्तीर्ण),रमेश मेश्राम (सामाजिक) आदींचा समावेश होता. स्वागतगीत अरविंद मसराम, संगेल व चिदानंद सिडाम यांनी सादर केले.

रंगले काव्यसंमेलन

स्मृतीगंध प्रतिष्ठानचे प्रवीण आडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे प्रा. राजेश देवाळकर, विजय वाटेकर यांच्या उपस्थितीत कवी संमेलन रंगले. सुधाकर कन्नाके, गोपाल शिरपूरकर, शंकर लोडे, अर्जूमन बानो शेख, संतोषकुमार उईके, सुनील बावणे, धर्मेंद्र कन्नाके, राहुल दहिवले, नीरज आत्राम, मृणाल कांबळे आदींनी कविता सादर केल्या. गीता रायपुरे-देव्हारे यांनी सूत्रसंचालन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये