ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्युत तारेच्या स्पर्शाने ८ जनावरांचा मृत्यू

ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

   तालुक्यातील उसेगाव येथील चरायला गेलेल्या ६ बैल व २ गाईंना शेतशिवारातील तुटून पडलेल्या विद्युत तारेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

     या अपघातात कालीदास पाल १ बैल, बाळुजी ठुसे १ बैल, संतोष भोयर १ गाय, देवाजी भोयर १ बैल, हिराजी गोहणे १ गाय, माणिक गोहणे १ बैल, अरुण भोयर १ बैल, भोजराज गोहणे १ बैल यांची जनावरे ठार झाले असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

     ऐन शेतीच्या हंगामात जनावरे मरण पावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये