ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विद्युत तारेच्या स्पर्शाने ८ जनावरांचा मृत्यू
ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
तालुक्यातील उसेगाव येथील चरायला गेलेल्या ६ बैल व २ गाईंना शेतशिवारातील तुटून पडलेल्या विद्युत तारेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या अपघातात कालीदास पाल १ बैल, बाळुजी ठुसे १ बैल, संतोष भोयर १ गाय, देवाजी भोयर १ बैल, हिराजी गोहणे १ गाय, माणिक गोहणे १ बैल, अरुण भोयर १ बैल, भोजराज गोहणे १ बैल यांची जनावरे ठार झाले असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.
ऐन शेतीच्या हंगामात जनावरे मरण पावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.