ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी जयंतीदिनानिमित्य माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात आदरांजली कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्य दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी चंद्रपूर येथील स्थानिक गांधी चौकातील कॉग्रेस कार्यालयात माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांनी स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली वाहीली.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांची ८० वी जयंती आज देशात सर्वत्र साजरी केली जात आहे. ते ख-या अर्थाने संगणक माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार प्रणालीचे जनक होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता व जाती निरपेक्षतेवर आधारीत संविधानाला धोका पोहचणार नाही याची काळजी घेतली व देशाची अखंडता अबाधित राखली. पं. जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिराजी गांधी यांनी कृषी, उद्योग, विज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात देशाचा विकास करण्याच्या योजना राबविल्या त्या पुढे सक्षमतेने पूढे राबविण्याचे कार्य राजीवजीनी केले.

 याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष अरूण बुरडकर, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी, राजु लाहमगे, कामगार युनियनचे तारासिंग कलसी, क्रिष्णन नायर, रामदास वाग्दस्कर, अनिल तुंगीडवार, विरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, गजानन दिवसे, सुदर्शन पुल्ली, बाबूलाल करूणाकर, सायरा बानो, अनंता हुड, पृथ्वी जंगम, अनुप संधू, यादव शंभरकर, सुनिल वावणे, अनंता पाल, सतीश बिजन्पूरे, लालबाबू गुप्ता व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये