ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

सूर्यांश संस्थेचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

मातकर, तांबोळी, दातार, गोराडे, मेश्राम, खानोरकर, भारशंकर आणि दहागावकर मानकरी

चांदा ब्लास्ट

चंद्रपुरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२२ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार काल निवड समिती प्रमुख माजी नगरसेवक संजय वैद्य आणि संस्थेचे सचिव प्रदीप देशमुख यांनी जाहीर केले. मागील १० वर्षांपासून संस्थेतर्फे राज्यभरातील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून त्यावर्षी प्रकाशित विविध साहित्यकृतीच्या प्रवेशिका मागवल्या जातात आणि त्यातून पुरस्कार प्रदान केले जातात. प्राप्त साहित्यकृतीतून निवड समितीने खालील साहित्यकृतींची निवड केली आहे.

कवितासंग्रहासाठी देण्यात येणारा शिवाजीराव चाळक पुरस्कृत सीताबाई सखाराम चाळक स्मृती कवितासंग्रह पुरस्कार  पूनीत मातकर (गडचिरोली) यांच्या ‘ऐन विणीच्या हंगामात’ या कवितासंग्रहाला, कथासंग्रहासाठी देण्यात येणारा प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार दीपक तांबोळी (जळगाव) यांच्या  ‘अशी माणसं अशा गोष्टी’ या कथासंग्रहाला, कादंबरीसाठी प्रदान करण्यात येणारा अशोकसिंह ठाकूर पुरस्कृत पुरस्कार डॉ. स्मिता दातार (मुंबई) यांच्या ‘फक्त तिच्यासाठी’ या कादंबरीला तर बालसाहित्यासाठी देण्यात येणारा विमलबाई देशमुख स्मृती पुरस्कार संजय गोराडे (नाशिक) यांच्या ‘कोवळे कोंब’ या बालसाहित्याला आणि डॉ. विद्याधर बन्सोड पुरस्कृत शकुंतला देवदास बन्सोड स्मृती वैचारिक पुरस्कार सविता कांबळे (नागपूर) यांच्या ‘धम्मक्रंती आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य’ या वैचारिक ग्रंथाला प्रदान करण्यात येणार आहे. नाटकासाठी अपेक्षित साहित्यकृती प्राप्त न झाल्याने यावर्षी सदर पुरस्कार देण्यात येणार नाही.

जिल्ह्यातल्या ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात येणारा बाबुराव कोंतमवार स्मृती साहित्य सन्मान एकूण साहित्यविषयक योगदानासाठी कवी डॉ. धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी) याना, कलाक्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा डॉ. तुकाराम पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार संगीत साधक मारोती भारशंकर (चंद्रपूर)  आणि नवोदित युवा साहित्यिकाला दिला जाणारा मिलिंद बोरकर स्मृती नवोन्मेष पुरस्कार सूरज दहागावकर (चंद्रपूर) याना प्रदान केला जाईल. नवोन्मेष पुरस्काराव्यतिरिक्त सर्व पुरस्काराचे शॉल, सन्मानचिन्ह, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख राशी असे स्वरूप आहे.  नवोन्मेष पुरस्कार हा कौतुक असल्याने या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र दिले जाते. पुरस्कार निवड समितीत परीक्षक म्हणून डॉ विद्याधर बन्सोड, किशोर जामदार, विवेक पत्तीवार, दीपक शिव, भारती लखमापुरे आणि गीता रायपुरे यांनी सहकार्य केले.

सर्व पुरस्कार संस्थेच्या रविवार दिनांक ३ सप्टेंबरला  सरदार पटेल महाविद्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केले जाईल. पुरस्कार जाहीर करतेवेळी सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सीमा पाटील, तनुजा बोढाले, सुनील बावणे, सुरेश गारघाटे, नीता कोंतमवार, स्वप्नील मेश्राम, गजानन माद्यस्वार, योगेश भलमे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये