आरसीईआरटीमध्ये प्रथम वर्ष पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रमात सायबर सुरक्षेसह शिस्त ; व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरबाबत मार्गदर्शन ,; हेल्मेट वापरण्याचेही प्राचार्यांचे आवाहन

चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, शैक्षणिक शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन आणि सायबर सुरक्षेबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. विनोद दत्तात्रेय होते. प्रमुख पाहुणे म्हणून सायबर सिक्युरिटी सेलचे पोलीस निरीक्षक अली मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गिरी, सय्यद मॅडम तसेच खनके सर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसून आला. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विविध सुविधा, उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासातून यशस्वी करिअर घडवा
केवळ अभ्यासात चांगली कामगिरी करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य, तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करावी. महाविद्यालयात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा आणि भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
दुचाकीवरून महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. चिताडे यांनी केले. स्वतःची सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची असून वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात करून देणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. स्मिता काळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. पियाली जे. चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



