विदर्भवादी २८ सप्टेंबररोजी करणार नागपूर कराराची होळी
३० सप्टेंबरपासून विदर्भ संकल्प पदयात्रेला सुरुवात
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : विदर्भ राज्य झालेच पाहिजे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विदर्भात मागील काही वर्षांपासून आंदोलनाची श्रृंखला सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प विदर्भवाद्यांनी केला असून, या आंदोलनाचा भाग म्हणून विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असलेल्या नागपूर कराराची होळी २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात करण्यात असून, ३० सप्टेंबरपासून विदर्भ संकल्प पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामन चटप यांनी चंद्रपुररात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ राज्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून, ‘जिंकू किंवा मरू किंवा जेलमध्ये जाऊ’ असा निर्धारच विदर्भवाद्यांनी केला आहे. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी ३० सप्टेंबरपासून विदर्भ संकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथून या पदयात्रेला प्रारंभ होईल. यानंतर तळेगाव, आर्वी, श-कौडण्यपूर अशी ही पदयात्रा जाणार आहे. २ ऑक्टोबर रोजी कौंडण्यपूर येथे यात्रेची संागता होणार असून, येथे महिला मेळावा रुक्मिणीला विदर्भ राज्याच्या मागणीसाठी साकडे आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला अरुण केदार, मुकेश मासूरकर, प्रभाकर कोडबत्तुनवार, डॉ. रमेशकुमार गजबे, कपिल इद्दे, मिलिंद दिकोंडवार, मितीन भागवत, किशोर दहेकर, अंकुश वाघमारे आदी उपस्थित होते.