विदर्भ व मराठवाड्याला जोडणाऱ्या त्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा
सरपंच दिनकर वाघ व गावकऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पिंपळगाव चिलमखा ते पांगरी शाळे पावतो रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करण्यात आले आहे, परंतु नदी ते पांगरी शाळे पावेतो चा रस्ता हा खुप खोल व अरुंद आहे, सदर रस्ता अतिक्रमण मुळे नाल्याप्रमाणे झाला आहे, तेव्हा अतिक्रमण काढून रस्ता रूंद करण्याची मागणी सरपंच दिनकर वाघ व गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता बुलडाणा यांच्याकडे लेखी निवेदनात केली आहे.
सध्या हा रस्ता चिखल व खड्डामय झाला आहे, शेतावर राहणारे 20 ते 25 कुटुंब आहे त्यांची मुले शाळेत जाणे येणे करतात, पाण्यात बुडून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे, तेव्हा विदर्भ व मराठवाड्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा गावकरी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
असा इशाराही दिला आहे, निवेदनावर सरपंच दिनकर वाघ, रामेश्र्वर वाघ, राजेंद्र वाघ, दिपक खरात, विजय खरात, भगवान अंतरकर, शिवाजी वाघ, अंकुश जाधव, शंकर वाघ, गजानन कातखडे , अक्षय वाघ, अमोल जाधव, योगेश वाघ, व इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.