ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सालोरी येथील कृषीकन्यांचे आगमन शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

ग्रामपंचायत सलोरी कडून विद्यार्थिनींचे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तालुक्यातील सालोरी येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाच्या विध्यार्थीनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक अंतर्गत दिनांक 9 जून पासून सालोरी येथे निवासी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या विध्यार्थ्यांचे ग्रामपंचायत सलोरी कडून स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच प्रतिभा शेरखुरे, उपसरपंच गजान‌नजी देहारी कु. निकीता मगरे यांची उपस्थिती होती.

      यामध्ये महावि‌द्यालयाच्या शेवटच्या वर्षातील ७व्या सत्रातील वि‌द्यार्थिनी सुहानी दिवे, दिक्षा फेंडर, तेजस्विनी गहाणे, वैष्णवी गहाणे, युराणी गहाणे, फाल्गुनी गायकवाड, सुहानी रामटेके या कृषीकन्या उपस्तीत होत्या. या कार्यक्रमा अंतर्गत हे तीन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. त्यात माती व पाणी परिक्षण, विविध पिकोचे लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व कीड यांची माहिती व व्यवस्थापन,

जनावरांची काळजी व संगोपन, शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण,बीजप्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

      या कार्यक्रमाला, प्राचार्य डॉ. पोतदार सर, डॉ. महाजन सर, कार्यक्रम समन्वयक राहुल तायडे सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. अश्विनी मानकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये