चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – ना.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूरमध्ये महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद कडू, महायुती समन्वय प्रमुख देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, आरपीआय (आठवले गट) ग्रामीण अध्यक्ष जयप्रकाश कांबळे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे हरी दुर्योधन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख अतुल देशकर, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, भाजप नेते रामपाल सिंग, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिंदेंचा एस, फडणविसांचा एफ, पवारांचा पी… म्हणजे सुपर फास्ट प्रोग्रेस काम करत आहे. आपण महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून एकत्र आलोय. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आज एका वैचारिक भावनेतून एक स्वर, एक लक्ष्य अशी भूमिका मांडली. आपण विविध पक्षांचे असलो तरीही हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.’ समन्वय समितीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या समन्वय समितीचा मी देखील सदस्य आहे. समितीच्या बैठकीत मी जिल्हास्तरीय एकत्रीकरणासाठी आग्रही होतो. आज महाराष्ट्रात एकाच दिवशी महायुती एकत्र येत आहे, याचा आनंद होत आहे. एक सूर, एक लक्ष्य आणि एक दिशा हा भाव ठेवावा लागेल. त्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती नेमण्याची गरज आहे. यासोबतच युवकांची आणि महिलांचीही समन्वय समिती स्वतंत्र असायला हवी. विधानसभानिहाय एकरुपता यावी म्हणून ६ विधानसभांच्या तारखा निश्चित करून नियोजन आवश्यक आहे.’ चंद्रपूरमध्ये महायुतीच्या वतीने महिलांना एकत्र करून मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राहुल गांधी आले तरीही…
हमारा बुथ सबसे मजबुत
विरोधकांकडे विकासाचा जाहीरनामाच नाही
योजना लोकांपर्यंत पोहोचवा
महायुतीच्या एकजुटीचा आदर्श