ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्र व राज्य सरकारच्या बेजबाबदार कृतीचा रिपाइं (आंबेडकर) तर्फे तीव्र निषेध !

नराधमाला भर चौकात फाशी देण्याचा कायदा बनायला पाहिजे : महेंद्र मुनेश्वर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करणारे आहोत.या देशात संविधान सर्वोच्च स्थांनी आहे.म्हणूनच बलात्कार करणाऱ्या नारधमावर,माय भगिनीवर घडलेल्या अत्याचाराच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत त्या नराधम गुन्हेगाराला भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे गरजेचे आहे.त्यासाठी असा कायदाच बनायला पाहिजे.संसदेने तो बनवावा.हेच खरे प्रायचीत्त नराधम गुंडांना ठरेल.असे रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी म्हटले आहे.

देशात जवळपास एकशे पन्नास अधिक माजी व हल्लीचे खासदार आणी आमदार आहेत की ज्यांच्यावर आजही,महिलांच्या अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांसाठी केसेस दाखल आहेत.महायुतीच्या केंद्र व राज्य सरकारची कृतीच लंपट गुंडांना पोसणारी आहे.

सर्वात जास्त खासदार व आमदार तसेच लोकप्रतिनिधी हे बिजेपीचे असुन ते महिलांना छेडण्याच्या व अत्याचार करण्याच्या गुन्ह्यांत अडकले आहेत.केंद्र व राज्याचे गृहमंत्री व सरकार आरोपी असलेल्या बऱ्याच खासदार आणि आमदारांना अभयदान देण्याचे पाप करत आहे.त्यामुळे शोषित पिडीत वंचित बहुजन व सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुली व तरुणी तसेच महिला भगिनीवर,गुंड प्रवृत्तीचे लिंगपिसाट खुलेआम अत्याचार करतांना दिसतात.केंद्र व राज्य सरकारच्या अशा बेजबाबदार वर्तन कृतीचा रिपाइं (आंबेडकर) पक्ष तीव्र निषेध करित आहे.असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ नेते महेंद्र मुनेश्वर म्हणाले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये