ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

5 वर्षांपासून रखडलेले पट्टे व घरकुल त्यांना त्वरित देण्यात यावे

बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वर्धा शाखेतर्फे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुलगाव व मोरांगना येथील 25 ते 30 वर्षांपासून राहत असलेल्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमित करण्यात येऊन 5 वर्षांपासून रखडलेले पट्टे व घरकुल त्यांना त्वरित देण्यात यावे,या मागण्यांसाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वर्धा शाखेतर्फे दिनांक 03/03/2025 ला जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी मॅडम नी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन चे महाराष्ट्र अध्यक्ष शेषरावजी रोकडे,सचिव सिद्धार्थ सोमन,संघटक सिद्धार्थ डोईफोडे,सचिव नरेश मूर्ती,अशोक चिमणकर,संजय पटवमोल, वर्धा महासचिव अजय घंगारे,प्रवक्ते वसंत मुरारकर,संजय हाडके,विक्की उईके,सुरेश शिर्के,विठ्ठल धुर्वे,दमदुजी उईके,रेणुका जाणवे मॅडम,कुसुम कांबळेव् वैशाली बांगडे व अनेक कार्यकर्त्ये उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये