सिडीसीसी बँकेच्या नोकर भरती परीक्षेचा घोळ परीक्षार्थीने काढला बाहेर
चुकीचे प्रश्न आणि गुणांची हेराफेरी करुन जवळच्या पैसे दिलेल्यांना नोकरी मिळणार - विद्यार्थ्यांचा आरोप.

चांदा ब्लास्ट
सिडीसीसी बँकेची भ्रष्ट मार्गाने चालवलेली नोकर भरती सध्या महाराष्ट्रात गाजत असून या विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे जिल्हा बँके समोर आमरण उपोषण सुरु आहे, दरम्यान या आंदोलनाला अनेक जिल्ह्यातील परीक्षार्थी भेट देऊन सिडीसीसी बँकेच्या परीक्षेत कसा घोळ करण्यात आला व परीक्षा घेणारी कंपनी कशी बोगस आहे याबद्दल आपले मत नोंदवले आहे, या संदर्भात परीक्षार्थिनी परीक्षेत विचारलेले प्रश्न कसे चुकीचे होते व आक्षेप घेतल्या नंतर काहीच कार्यवाही झाली कां नाही असे प्रश्न बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांना विचारले असता त्यांनी कंपनीच्या सिईओ ला विचारणा केली पण त्यावर कंपनीने मार्क्स वाढवून मिळेल असे सांगून वेळ काढून नेल्याचा आरोप केला आहे, यावेळी प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातून आलेले दत्ता पौळ यांनी उपोषण मंडपात पत्रकारासमोर मत मांडले.
मागील अनेक वर्षांपासून एमपीएससी, यूपीएससी सारख्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असतांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची लिपिक आणि शिपाई पदाची भरती परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती व शिपाई या पदाची मुलाखत झाली आहे आणि लिपिक पदाची मुलाखत सुरु आहे, मात्र या नोकर भरती परीक्षेत सुरुवाती पासूनच म्हणजे दिनांक २१ डिसेंबर ला कॉम्पुटर मध्ये घोळ होता, अनेक प्रश्न सुद्धा चुकीचे होते व त्यामध्ये कुठल्याही प्रश्नांच्या योग्य पर्याय निवडला असता थोड्या वेळाने आपोआप चुकीचा पर्याय निवडला असल्याचे दिसत होते असे सर्वच परीक्षा केंद्रात मुलांच्या लक्षात येताच एका तासातच महाराष्ट्रातील मुलांनी सहाही परीक्षा केंद्रात गोंधळ घालून आंदोलन केले, त्यामुळे प्रशासनाने त्या दिवशीची परीक्षा रद्द केली, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गेले असता परीक्षा घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाने फक्त जालना जिल्ह्यातील परीक्षा रद्द केली मात्र त्याचं दिवशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या, दरम्यान परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी औरंगाबाद या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली मात्र त्यांची पूर्व सूचना परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री देण्यात आली, त्यामुळे जे दुरचे मुलं होते ते औरंगाबाद केंद्रावर पोहचू शकले नाही, या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर कुठलीही तपासणी (बायट्रिक) ची व्यवस्था नव्हती, परीक्षेचा शेवटचा दिवस म्हणजे २९ डिसेंबर रोजी जालना केंद्र असतांना नंतर नांदेड या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली त्यामुळे मुलांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.
ह्या परीक्षा झाल्यानंतर ९ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रश्नावर आक्षेप घेण्याची वेळ देण्यात आली, पण उत्तरापत्रिकेत कुठलाही बदल न करता १२ तसाच्या आत निकाल लावून शिपाई पदासाठी मुलाखती करिता बोलाविण्यात आले. मात्र दत्ता पौळ यांना लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत ६५ मार्क्स असताना देखील मुलाखती करिता बोलाविण्यात आले नाही तर त्याच्या मित्रांना ५७ मार्क्स आले असतांना त्याला मात्र बोलविण्यात आले, हिचं तक्रार घेऊन ते २० जानेवारी रोजी सकाळी १०.०० पासून सिडीसीसी बँकेच्या मुख्यालयात विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्या ऑफिस बाहेर बसाविण्यात आले, त्यावेळी त्यांच्यासोबत इतर चार परीक्षार्थी होते.
त्यावेळी त्यांनी एक तास वेळ परीक्षार्थी यांना दिला दरम्यान परीक्षार्थी नो बँकेच्या सिईओ ला परीक्षा घेणा-या आयटीआय कंपनीचे हेल्पपाईन नंबर आणि मेल बंद असल्याचाचत विचारणा केली असता त्यांनी लगेच कंपनीच्या सिइओ ला कॉल करुन विचारणा केली की आपले हेल्पलाईन नंबर को बंद आहे व इमेल कां जात नाही त्यावर त्यांनी आम्ही हे हेल्पलाईन मोबाईल नंबर आणि ई-मेल लगेच सुरु करुन तुमच्या तक्रारी ला उत्तर देऊ असे सांगितले परंतु अजूनही हेल्पलाईन नंबर व ई-मेल सुरु करण्यात आले नाही, त्यानंतर कंपनी च्या सिईओ ला फोनवर बोलताना विचारले की संगणकाचे जनक कोण हा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले चाल्स वेबस आणि हेचं उत्तर दत्ता याचे होते मात्र हेच उत्तर असतांना त्यांनी त्याला या प्रश्नाचे मार्क कां दिले नाही? हा प्रश्न विचारला असता सकाळ पर्यंत तुमच्या उत्तर पत्रिकेत दुरुस्त करू अशी ग्वाही दिली होती पण २४ तासानंतर सुद्धा उत्तर तालिकेत कोणताही बदल करण्यात आला नाही आणि हेल्पलाईन नंबर आणि ई-मेल सुद्धा सुरु करण्यात आले नाही. महत्वाची बाब म्हणजे जेंव्हा बँकेच्या उपाध्यक्ष यांना विचारले त्यांना ६५ मार्क्स लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत असतांना मुलाखती करिता बोलावले नाही मग ५७ मार्क असलेल्या माझ्या मित्राला को बोलावले? हा प्रश्न केला असता तू दोन तासात प्रश्न सोडवले तर तुझ्या मित्राने एका तासात प्रश्न सोडवले म्हणून फास्ट प्रश्न सोडविल्याने त्याला मुलाखती करिता बोलाविण्यात आल्याचे हास्यास्पद उत्तर मिळाले आहे, त्यामुळे ही परीक्षा बोगस असून केवळ पैसे देणाऱ्यांना नोकरी मिळणार असल्याचे दिसत आहे. करिता या बँकेची नोकर भरती रद्द करावी अशी आमची परीक्षार्थी दत्ता पौळ व इतर परीक्षार्थीनी मागणी केली आहे.
दत्ता बाबूराव पौळ राहणार मुंबर ता. पूर्णा जिल्हा परभणी.