
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संकटमोचक, परम रामभक्त, तारणहार पवनपुत्र बजरंग बली मंदिर निर्मिती सोहळा गवराळा येथिल स्वराज नगर येथे मोठ्या उत्सवात व भक्तीमय वातावरणात पार पडला. मंदिर निर्मिती करीता सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे ले आऊट मालक ऍड. युवराज धानोरकर यांनी योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक व दानशूर श्री. निलेशजी गुंडावार यांचे हस्ते विधीवत पूजनाने भूमिपूजन करण्यात आले. मंदिर निर्मिती हि हनुमान जन्मोत्सव पूर्वी करण्याचा मानस स्वराज नगरी येथिल नागरिकांनी व्यक्त केला. सर्व गवराळा वासी व हनुमान मंदिर निर्मिती समितीच्या सदस्यांनी सोहळा संपन्न करण्यास विशेष सहकार्य केले.