ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस बियाणे विक्रेत्यांसह कृषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा

प्रदीप मोहितकरसह शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप : आत्मदहणाचा दिला इशारा

चांदा ब्लास्ट

कोरपना येथील एका कृषी केंद्र संचालकाने बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली. याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या बोगस बियाणे प्रकरणाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून कृषी केंद्र संचालक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी शेतकरी प्रदीप मोहितकर व अन्य शेतकऱ्यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

प्रदीप मोहितकर यांनी कोरपना येथील गणेश कृषी कंेद्रातून ननेम्स इंडिया प्रा. लि.हैदराबाद या कंपनीच्या मिरची बियाण्यांचे बारा पॉकिट खरेदी केले. पॉकिटावर बिल क्रमांक आणि लाट क्रमांकही नोंदविला होता. तसेच बॅच क्रमांकसुद्धा होाा. त्यांनी १८ जून रोजी मिरची बियाणे रोपांची लागवड केली. पंरतु, पंधरा ते वीस दिवसानंतरही केवळ २० टक्केच बियाणे उगवली. दरम्यान, बियाणे बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी केंद्र संचालकाला याबाबतची माहिती दिली. परंतु, कृषी केंद्र संचालकानेही याकडे दुर्लक्ष केले. त्यांनतर मोहितकर यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली. कृषी अधिकाऱ्यांनी शेतात भेट देत पंचनामा केला. परंतु, आर्थिक देवाणघेवाणीतून कृषी अधिकारी खोटा अहवाल तयार करून कृषी केंद्र संचालकाला पाठीशी घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, वरिष्ठानी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करून कृषी केंद्र संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी त्यांनी केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहणाचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला कैलास येसेकर, अरविंद धिमान, सचिन फाले, खान उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये