सिंधी मेघे ग्रामपंचायत येथील प्रशासकीय अधिकारी यांनी केलेल्या भस्ट्राचाराची चोकशी करत निलंबित यावे – भिम आर्मी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सिंधी मेघे ग्रामपंचायत येथील प्रशासकीय अधिकारी हेमंत देवतळे यांनी आपल्या मनमर्जीतील एकाच ठेकेदारांना कामे देऊन टक्केवारीसाठी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत पदभार काढून चोकशी होत पर्यत निलंबित करण्याबाबत लेखी तक्रार उपजिल्हाधिकारी अधिकारी साहेब यांना देण्यात आली.सिंधी मेघे ग्रामपंचायत व इतर ठिकाणी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून प्रशासकीय अधिकारी याची नियुक्त्या केल्या गेल्या आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी हे कामकाजाची देखील करण्यासाठी नसून आपले खिसे कसे गरम करता येईल यासाठी कामे करत आल्याचे दिसून येत आहे ,विशेष म्हणजे सिंधी मेघे ग्रामपंचायत येथील प्रशासकीय अधिकारी हे आपल्या पदाचा चुकीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या चार ते सहा महिन्यापासून प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती केली असून सिंधी मेघे ग्रामपंचायत येथे शासकीय अधिकारी यांनी 80 ते 90 लाखाची कामे बिनानिविदा काढले ,आपल्या जवळील मनमर्जीतील ठेकेदार यांना कसे काम देता येईल व टक्केवारी कशी मिळेल यासाठी सतत प्रयत्न करत असतात, गेल्या 6 महिन्यापासून काढलेल्या कामे एकाच ठेकेदार यांनी दिली असून कामाची पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम बघण्यास मिळत आहे.
याबाबत वारंवार लोकांनी तक्रारही केलेल्या आहे, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही काही टक्केवारीसाठी सतत एकाच ठेकेदारांना पंचवीस ते तीस कामे दिल्याचे दिसून येत आहे, काही ठिकाणी बघण्यास मिळाले आहे की ठराव होण्याअगोदर प्रशाकीय मान्यता साठी पाठवण्यात कामे पाठवण्यात आली आहे.
सतत ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराचे प्रमाण या प्रशासकीय अधिकारी हेमंत देवतळे यांच्यामुळे वाढले असून त्याची सखोल चौकशी केल्यास आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे 1)सिंधी मेघे ग्रामपंचायत येथील अधिकारी हेमंत देवतळे यांच्याकडून हा पदभार काढून टाकण्यात यावा व त्याची चोकशी होत पर्यत निलंबित करण्यात यावे.
2)सिंधी मेघे ग्रामपंचायत येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी, प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या मनमर्जीचे ठेकेदार यांना दिलेल्या देयकाची चौकशी करण्यात यावी ,व उर्वरित देयक थांबण्यात द्यावे.
3)या पुढील कोणत्याही कामाची ऑर्डर देण्यात येऊ नये, नवीन कामाची माहिती लोकमत,देशोन्नती, पुण्यनगरी, नवभारत,लोकसत्ता,इत्यादी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावी.
येत्या 7 दिवसाच्या आत वरील मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरुवात करण्यात येईल उपोषण दरम्यान कोणत्याही अनुसूचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन व प्रशाशनाची राहील.अशी तक्रार आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने देण्यात आली.