साधु – संत हे जगाचा वारसा आहेत : जैन मुनी विशेषसागर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सर्व धर्मांमध्ये गुरुचा महिमेच वर्णन केल आहे. गीता ग्रंथात गुरु या शब्दाला महामंत्र म्हटले आहे. गुरु म्हणजे शुभचिंतक, हितचिंतक, मार्गदर्शक, उपकारकर्ता. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे जीवनात गुरु नाही त्यांचे जीवन सुरू होत नाही. जीवनात गुरु नसलेकी व्यक्ती त्याच्या मनाचा राजा बनते. आपण जे काही बोलतो ते बरोबर आहे, आपण जे करतो तेच बरोबर . उक्त उद्गार प. पू वात्सल्य शिरोमणी श्रमण मुनी श्री १०८ विशेषसागर जी गुरुदेवांनी देवलगांवराजा येथील धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना म्हटले
पू. मुनिश्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात, येथे म्हण आहे की साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा. साधु – संत हे जगाचा वारसा आहेत. ज्या समाजात साधु – संतांचा आदर केला जातो, तिथे हिरवळ आणि समृद्धी असते. दिगंबर संत हे त्याग आणि तपस्येचे जिवंत मूर्ति आहेत.
ते धन आणि संपत्तीचा त्याग करतात. त्यांच्याकडे पिच्छी-कमंडल आणि फक्त आवश्यक शास्त्र च ठेवतात उन्हाळ्यात ए. सी कूलर, पंखा इत्यादी आणि हिवाळ्यात रूम हीटर इत्यादी वापरत नाही. दिवसातून एकदाच शुद्ध अन्न घेतात, चौक्यामधे चवीची नाही तर शुद्धतेची काळजी घेतात, संतांमध्ये स्व-परोपकार सोबत परोपकाराची भावना ठेवतात, समाजात कैची सारखे नाही तर ते सुईसारखे काम करतात. समाजाला एकत्र करण्याबद्दल बोलतात. पंथवाद, संतवादविषयी नव्हे तर आगमविषयी बोलतात. पंथवाद- संतवाद माणसाला संसारात भ्रमण करायला लावतो आणि जो आगमचे पालन करतो तो एके दिवशी संसार पार करतो