ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

या पृथ्वीवर माणसे दोन प्रकारची असतात, सज्जन आणि वाईट _ उपाध्याय श्री १०८ विशेषसागरजी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

या जगात, प्रत्येक घरात, शहरात, गावात, तुम्हाला दोन प्रकारची माणसे आढळतील, सज्जन स्वभावाची आणि वाईट स्वभावाची. सज्जन स्वभावाची व्यक्ती दानधर्म, धार्मिक आणि सामाजिक कार्यात आनंद मिळवते आणि वाईट स्वभावाची व्यक्ती इतरांना दुखावण्यात, इतरांना त्रास देण्यात आणि चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यात आनंद मिळवते. वरील विधान गणाचार्य श्री विरागसागर जी महाराज यांचे शिष्य प.पू.उपाध्याय श्री १०८ विशेषसागर जी महाराज यांनी देऊळगाव राजा येथील जैन मंदिरातील धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना केले.

दिनांक 19 जून रोजी मुनिश्री विशेष सागरजी यांचे श्रींच्या पुण्यनगरीत मंगलमय आगमन झाले. त्यांच्या आगमनाने दिगंबर जैन समाजामध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. शहरातील दिगंबर जैन समाज हा मुनी भक्त असून नेहमीच जैन मुनींच्या सेवेत तत्पर असतो. आज सकाळी जैन मंदीरात समाजाला त्यांनी आपल्या अमृत वाणीतून मंत्र मुग्ध केलें.

      पू. उपाध्याय श्री पुढे म्हणाले की जैन तत्वज्ञानात व्यक्तीची पूजा केली जात नाही, तर व्यक्तिमत्त्वाची पूजा केली जाते;नावाची नाही, सद्गुणींची पूजा केली जाते, ३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता जालना येथील अक्षय मंगल कार्यालयात आचार्य विरागसागर जी महाराजांनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनात म्हटले होते की वेळ कोणालाच माहीत नाही. सध्या आपण बोलू शकतो, उद्या बोलू शकू की नाही, आत्ता आपण आठवत आहोत, उद्या आठवत राहू की नाही, म्हणून योग्य निर्णय वेळीच घेतला पाहिजे. आचार्यश्री विरागसागर जी महाराजांनी समाधीच्या अकरा तास आधी आचार्यपदाचा त्याग केला होता आणि सर्व प्राण्यांकडून क्षमा मागितली होती आणि सर्व प्राण्यांना क्षमा करून ४ जुलै २०२४ रोजी पहाटे २. वा २४ मिनिटांनी उत्कृष्ट समाधी प्राप्त केली होती. मुनी दीक्षा आणि साधनेचे फळ म्हणजे शरीर निरोगी अवस्थेत योग्यरित्या सोडणे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये