सावली तालुक्यातील आसोला चक आणि सावंगी दीक्षित येथील नागरिकांचा उपोषणाचा इशारा
पुनर्वसन करताना शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ; मायबाप सरकार लक्ष देईल का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील आसोलाचक व सावंगी दीक्षित ही गावे आसोलामेंढा या इंग्रज कालीन तलावाच्या बाधित क्षेत्रात येत असून सदर गावाचे पुनर्वसन सावली तालुक्यातील सायमारा येथे होत असून सदर गावाचे पुनर्वसन अगदी संथगतीने होत असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी तहसील कार्यालय सावलीच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंग्रज कालीन आसोला मेंढा तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे यासाठी आसोला मेंढा तलावाला लागून असलेल्या आसोलाचक व सावंगी दीक्षित या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाचा मानस होता त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले सावली तालुक्यातील सायमारा येथे पुनर्वसन करून देण्याचे निश्चित झाले मात्र पुनर्वसनाचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला पुनर्वसन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व नागरिकांना समान रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले होते मात्र काही व्यक्तींना ३,७६,००० तर काही व्यक्तींना ०८ लाख ७६ हजार रूपये देण्याचे ठरवण्यात आले यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. गावातील किती लोकांना किती अनुदान मिळाले त्यांची यादी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला.
तसेच अठरा वर्षांवरील मुलामुलींना लाभार्थी रक्कम वेगळ्या स्वरूपात मिळावी, नागरिकांच्या संपूर्ण शेतीची सातबारा नुसार रजिस्टर करण्यात यावी,सायमारा गावाजवळील नागरिकांना शेतीची उपलब्ध करून देण्यात यावी,विवाहित मुलांना जरी प्लॉट मिळाले असले तरी त्यांना अनुदान मिळालेले नाही,पुनर्वसन प्रमाणपत्र देण्यात यावे क,सायमारा येथे पायाभूत सुविधा पाणी,शिक्षण,आरोग्य, रस्ते,गटारे या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे,घरकुल बांधकामाची रक्कम त्वरित देण्यात यावी,रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे,पुनर्वशीत गावातील लोकांना रेती व मुरूम मोफत देण्यात यावे,यासारख्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.
दरम्यान आसोला मेंढा तलावाच्या नूतनीकरणाचे कामकाज सुद्धा संत गतीने सुरू असल्यामुळे सावळी तालुक्यातील नागरिक दुबार पिकासाठी प्रतीक्षा करीत आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा असा पवित्रा पत्रकार परिषदेत नागरिकांनी घेतला पत्रकार परिषदेला इंदरशहा पेंदाम,मकरू जुमनाके,अमोल शेडमाके रवी घोडाम,महादेव कुलसंगे, निकेश मेश्राम व आसोलाचक आणि सहाव्या दिवशी या गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थित होती.