ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील रेती घाट सुरु करा
माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावणकुळे यांच्या कडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
रेती घाट सुरू झाल्यास घरकुल लाभार्थी, कामगार व खाजगी बांधकाम करणाऱ्यांना दिलासा मिळेल – प्रा. अतुल देशकर.
मागील काही दिवसांपासून ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील रेती घाट बंद आहेत. यामुळे घरकुल, खाजगी बांधकाम, शासकीय बांधकामे बंद पडली आहेत. सोबतच कामगार, बांधकाम मिस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रीशियन यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. या मुळे संबंधित लोकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. संबंधित लोकांना दिलासा देण्यासाठी रेतीघाट सुरू करावेत अशी मागणी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कडे केली आहे.
पुढील ४ महिन्यातच पावसाळा सुरू होईल. पुढील ४ महिन्यात घराचे बांधकाम पूर्ण न झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी परिसरातील रेती घाट सुरु करण्याची मागणी माजी आमदार प्रा. देशकर यांनी केली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दिले आहे. येत्या दिवसात रेती घाट सुरू झाल्यास बांधकाम क्षेत्रात निगडीत लोकांना दिलासा मिळणार आहे.