Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कै.अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

आधुनिक पदधतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करुन विद्यार्थांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुक्यातील अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कुंभेझरी येथील कै.अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. यावेळी तीन विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली. अत्यंत पारदर्शकपणे हे निवडणूक प्रक्रिया पार पडली.शालेय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा.गांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक अधिकारी प्रा. वावरे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.यावेळी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते निवडणुकीमध्ये मतदान कसे केले जाते. निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने मतदान वळविण्यासाठी काय करावे लागते. शाळेत अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मला निवडून दिल्यास मी शालेय कार्यक्रमात माझ्या कारकिर्दीत शालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी योग्य उपक्रमाच्या माध्यमातून चालना देण्याचे काम करेल, सांस्कृतिक क्रीडा व इतरही उपक्रम राबवेल अशी आश्वासनाचा जाहीरनामा प्रकाशित करून ही निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार विजय हौशीराम भालेराव यांना २२ तर कुणाल रघुनाथ जाधव यांना ३१ मते तर सिद्धेश्वर दिलीप जाधव यांना १ मत पडल्याने या निवडणुकीत कुणाल रघुनाथ जाधव यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तर  शिक्षण मंत्री म्हणून अंजली नामदेव चव्हाण,आरोग्य व स्वच्छता मंत्री पुनम विठ्ठल राठोड,सांस्कृतिक व क्रीडा मंत्री वैभव बाबु राठोड यांची निवड झाली. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक पाचभाई, लोढे, प्रा. सुग्रीव गोतावळे, प्रा. रमेश मालेकर,बुचे,जीवने,वाघमारे, पेंदोर,अहिरकर,बोरीकर,मोतेवाढ आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये