ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीसन्मान कर्तव्याचा

ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार : विदर्भवादी ओबीसी नेते  डॉ. अशोक जीवतोडे

डाॅ. अशोक जिवतोडे : शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ ते विदर्भवादी व ओबीसी नेता

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

                     वाढदिवसनिमित्त ११ जुन

ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार : विदर्भवादी ओबीसी नेते  डॉ. अशोक जीवतोडे

मी माझ्या आयुष्याच्या कारकीर्दीत सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ व शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात निरपेक्षणे काम करीत आलेलो आहों, हाच बाणा कायम ठेवत ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून अनौपचारिक बैठकी दरम्यान संवाद साधतांना विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. जीवतोडे म्हणाले की, माझे वडील शिक्षण महर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी पूर्व विदर्भात शिक्षणाची दारे बहुजन समाजाकरीता उघडी करून दिली. त्यामुळे गेल्या सहा दशकांत आमच्या परिवाराला पूर्व विदर्भात शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून काम करता आले. यापुढे जावून सामाजिक चळवळीत काम करून आम्ही समाजाचे देणं लागण्याचे काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात ओबीसी, विदर्भ विकास चळवळ राबवितांना येथील बहुजन समाजाच्या मुळ प्रश्नांना हात घालण्याचे काम करता आले. शासन दरबारी रेटा लावून अनेक प्रश्न मार्गी लावले. ओबीसी हितासाठी अनेक शासन निर्णय निघाले. ओबीसी समाजात जाणीव जागृती झाली. याचे फलित आम्ही राबविलेल्या चळवळीला जाते. तसेच स्वतंत्र विदर्भ विकास चळवळीत शिक्षण महर्षी स्व. जीवतोडे गुरुजी यांच्या पासून आम्ही सक्रिय आहोत. विदर्भ राज्य व्हावे, ही आमची मागणी आहे मात्र तोपर्यंत विदर्भीय जनतेचा विकास होत रहावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. पत्र-व्यवहार, निवेदने, आंदोलने, धरणे, रास्ता रोको, मोर्चा, बैठका, अधिवेशने ही आमच्या चळवळीची शस्त्रे राहिली आहेत.

८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील अधिवेशनावर काढलेला ओबीसी समाजाचा भव्य न भूतो… मोर्चा काढला होता, तो ओबीसी आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा होता. या मोर्चाची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणविस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली, हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. देशभरात विविध राज्यात देशव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी चळवळीला बुलंद करण्याचे काम सुरू आहे.

तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे याकरिता विदर्भातील विविध जिल्ह्यात विदर्भवादी नेते मान. ऍड. श्रीहरीजी अणे यांचे नेतृत्वात यशस्वी जनमत चाचणी घेतली होती, ती अलिकडल्या काळातील स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे व विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरीता केलेले मोठे आंदोलन म्हणावे लागेल.

मंडल आयोगावेळेस तत्कालीन सरकारने ओबीसींना शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीत आरक्षण दिले होते. त्यामुळे ओबीसी चळवळ राबविताना ओबीसींचे हक्क अबाधित राहावे, हीच आमची अपेक्षा आहे.

भारतीय जनता पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो सर्व पक्षांसोबत आमचे संबंध सलोख्याचे राहिले आहेत. आमचा उद्देश हा केवळ विदर्भ प्रदेशाचा व येथील ओबीसी व बहुजन जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष हे आम्हाला समाजहित जपण्याचे साधन राहिले आहे.

ओबीसी व बहुजन समाज हा विदर्भातील जळणघडणीचा कणा आहे. या समाजाचे उत्थान झाले पाहिजे, या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. येथील जल, जंगल, जमीन, कोळसा, विज याचा लाभ येथील स्थानिक जनतेला व्हायला पाहिजे. येथे पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय वाढावे, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, राहणीमान उंचावे, ही आमची आग्रही भूमिका आहे.

शैक्षणिक संस्थेत आत्महत्या ग्रस्त, पूरग्रस्त, कोरोनाने मृत, आदी पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची दारे उघडी आहेत. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या दत्तक घेतल्या गेले आहेत. सोबतच सर्व धर्मीय सामूहिक विवाह

सोहळा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती कार्यक्रम, वृध्दाश्रमांना मदत, रुग्णांना मदत असे समाजपुरक अभियान सुरू असतात, ते अविरत सुरू राहतील.

म्हणून आता उर्वरीत आयुष्य हे ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी कार्य करीत राहू, हा प्रण असल्याचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

      वाढदिवसनिमित्त ११ जुन

डाॅ. अशोक जिवतोडे : शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ ते विदर्भवादी व ओबीसी नेता

साधारणत: १९५०नंतरचा काळ असेल. मुंबई व चंद्रपूर हे परस्पर विरुद्ध टोकाला. एक पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला. चांदा हा क्षेत्रफळाने तर मुंबई हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा. पश्चिमेकडून येणारे शिक्षणाचे वारे मुंबईच्याच भाग्याला. म्हणून मुंबई ही आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकली. चांदा जंगलांनी वेढलेलाच. खनिज द्रव्यांनी नटलेला; परंतु शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेला. शिक्षणाचा गंधही न पोहोचलेला. आदिवासी जिल्हा हे संबोधन होते. मागासलेला म्हणून सुखसोयींनी वंचित. शहराच्या ठिकाणी मर्यादित शाळा. खेड्यात दूरदूरपर्यंत माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. खेड्यातील तरुण शिक्षणापासून वंचित असायचे. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमता असूनही बुद्धीचा विकास लोप पावत होता. शहरापासून खूप दूर असणाऱ्यांना पुढचे शिक्षण सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. अज्ञानाची ज्ञानाकडे वाटचाल होण्याऐवजी अज्ञानाची अज्ञानाकडेच वाटचाल सुरू होती. एसटी तर सोडाच, साधा सायकलचा रस्ताही नव्हता. अशातच १९५३ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षणमहर्षी श्रीहरी बळीराम जिवतोडे यांनी चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटविली. एका किरायाच्या खोलीत जनता विद्यालय, चंद्रपूर सुरू झाले. शहरातच नाही, तर जिल्ह्यातील कोनाकोपऱ्यांत शाळा उघडून शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी उघडी करून दिली. चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक विकासाच्या रथावर स्वार झालेला होता. अवघ्या पाच वर्षांत म्हणजे १९५८ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने चंद्रपुरात जनता महाविद्यालयाच्या रूपाने उच्च शिक्षणाची सोय करून दिली. अल्पावधीतच संस्थेचा वटवृक्ष झाला. आजघडीला चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांची तीन महाविद्यालये, पाच व्यावसायिक महाविद्यालये, पाच कनिष्ठ महाविद्यालये, एक अध्यापक महाविद्यालय आणि २० शाळा आहेत. हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडले आणि घडताहेत. ते आज देशातच नाही तर जगाच्या काेनाकोपऱ्यांत मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. हा व्याप सांभाळणे सोपे नव्हते. या संस्थेची धुरा सचिव म्हणून डाॅ. अशोक जिवतोडे यांच्याकडे आली. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई अशोक जिवतोडे याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. या दाम्पत्याने या संस्थेचे गतवैभव टिकवण्याचे मोठे काम केले आहे. डाॅ. अशोक जिवतोडे हे उच्चविद्याविभूषित आहेत. एम.काॅम., एम.एड., एम.फिल. (वाणिज्य), एम.ए. अर्थशास्त्र,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये