आज पासून प्रकल्पग्रस्त कामगारा द्वारे काम बंद आंदोलन
103 प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगारांना, हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रा.लि.नि कामावर रुजू करून घ्यावे
चांदा ब्लास्ट
चंद्रपुर : अंतर्गत गुप्ता एनर्जी पॉवर लि. मध्ये कार्यरत कामगारांना, NCLT हस्तांतरित कंपन विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रा. लि. मध्ये स्थायी स्वरुपात रोजगार उपलब्ध करू देण्यात यावा. आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कामगारांचा संवेदनशील प्रश्नाला वाच्या फोडून न्याय देण्याविषयी प्रशासनाला, कंपनीला वारंवार निवेदनाद्वारे माहिती दिल्ली असून, दि. 25/08/2024 पर्यंत सबंधित प्रशासन तथा कंपनी व्यवस्थापनानी कामगारांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावे, अन्यथा आम्हा प्रकल्पग्रस्त शेतक तथा कामभारातर्फे संबंधित कंपनीच्या गेटसमोर दि. 26/08/2024 पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो असेल तर, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन तसेच कंपनी व्यवस्थापने राहील. असा निवेदना द्वारे मांगनी करून आज पासुन आंदोलन शुरू करण्यत आले.
दिनांक 04/08/2023 च्या सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपुर ह्यांच्या कार्यालयात झालेली बैठक उपरोक्त संदर्भाकीत विषयाद्वारे आपणास कळविण्यात येते की, 2008 ते 2009 या कालावधीत गुप्ता एनर्जी पॉवर लिमिटेड या कंपनी तर्फे मौजा उसेगाव, शेनगाव, बढ़ा, पांढरकवठा, घुग्घूस क्षेत्रातील शेतजमिनी विक्री करून लाटण्यात आल्या. तसेच कंपनीसाठी शेतजमिनी विकत घेत असतांना संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला आणि त्या जमिनीवर आश्रित शेतक-यांच्या परिवरातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नौकरी असा करार करून सदर करारपत्राद्वारे त्या शेतकरी कामगारांना नौकरी साठी 2012-2013 मध्ये रुजू करण्यात आले होते. सदर कंपनी एक ते दीड वर्ष व्यवस्थित चालवून काही कारणास्तव त्या कंपनी कडून उत्पादन बंद करण्यात आले होते. तसेच त्यानंतर संबंधित कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कामगारांना विश्वासात न गेता कंपनीने सरळ उत्पादन बंद करून टाकले. आपल्या शेतजमीनिवर आश्रित शेतकरी कामगारांना स्थायी नौकरीचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्या गेल्या. नंतर काही वर्षातच कंपनीने स्वताला दिवाळखोर घोषित करत, सदर कंपनीचा दावा NCLT कोर्टा समक्ष प्रस्तुत केला गेला.
आणि आज लिक्विडेटर मार्फत कामगारांना त्यांनी दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून काही तुटपुंजी रक्कम देवून कामगारांना त्यांच्या रोजगारापसून कायमचं डावलण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. कंपनी बंद झाल्यामुळे, त्या जमिनीवर आश्रित शेतकऱ्यांच्या जमिनीही गेल्या आणि त्या शेतीसंबंधित कामगारांचा रोजगारही गेला, यामुळे संबंधित कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला, तसेच या बेरोजगारिचा प्रश्न मिटविण्यासाठी कामगारानी जिल्हाधिकारीच्या कार्यालयसमोर वर्ष 2017 मध्ये आंदोलन सुद्धा केले आहे. त्या आंदोलना दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली, कामगारा सोबतच्या बैठकि अंतर्गत आश्वासन देण्यात आले की, कंपनी जेव्हा केंव्हा चालू होईल तेव्हा, जुन्या कार्यरत कामगारांना प्राधान्य देण्यात येईल. आणि कंपनी बंद झाल्यापासून तर आजपर्यंत हा कामगार नौकरीच्या आशेवर कंपनी पूर्ववत चालू होण्याची वाट पाहत आहे. सद्यपरिस्थितीत गुप्ता एनर्जी प्रा.लि.या कंपनीचे NCLT कोर्टानुसार परिचलनाचे सर्व हस्तांतरित अधिकार विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायवेट लि. या कंपनीकडे आले आहेत. सदर कंपनीकडून स्थानिक कामगारांना किंवा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना डावलून स्वतः ची जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. परप्रांतीय कामगारा द्वारे कंपनी पूर्ववत चालू करण्याहेतू मेंटेनन्स चे काम पूर्णत्वास आणले असून कंपनी ट्रायल बेस वर पूर्वस्त चालू होण्याच्या मार्गावर आहे. सदर कंपनिकडे तसेच संबंधित प्रशासनाकडे रोजगारासाठी आस लावून बसलेल्या कामगारातर्फे वारंवार निवेदन देवून कामावर रुजू करून घेण्यास विनंती करण्यात आली आहे , तरीपण मुजोर कंपनी कडून किंवा प्रशासनाकडून शेतकरी कामगारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या कंपनीकडून शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे रोजगार हिरविण्यात आले आहे. कदाचित या बेरोजगारीमुळे व आर्थिक, मानसिक, सामाजिक शोषनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्तेसह, आम्हा कामगारांच्या सुद्धा आत्महत्या व्हायला वेळ लागणार नाही. तरी संबंधित प्रशासनाला नम्र विनंती की, सदर कंपनीवर कठोर कारवाही करून NCLT च्या बाबतीत योग्य ती चौकशी करण्यात यावी व समस्त कामगार वर्गाला न्याय मिळवून देऊन त्यांना नोकरीवर स्थायी स्वरूपात सामावून घेण्यात यावे. यासाठी कामगारांना आज या काम बंद आता धरणे आंदोलनाचा आधार घ्यावा लागत आहे.
संबंधित आंदोलन विजय क्रांती जि.ई.पी.एल. पावर स्थायी कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे, कार्याध्यक्ष – प्रवीण लांडगे तथा जिल्हाध्यक्ष- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र, एन.एस.यु.आय.जिल्हाध्यक्ष – शफाक शेख, तसेच संघटनेचे महासचिव – महेंद्रा वडस्कर, उपाध्यक्ष- विजय सोनेकर, अरविंद पाचवाई, कार्यालयीन प्रमुख- सतीश शेंडे, राजू पिंपळशेंडे, प्रशांत ढेंगडे , जितेंद्र झाडे, नितीन खनके, अनिल पायपरे, राजेश जेनेकर, रंजीत पिंपळशेंडे, भारत खनके, प्रवीण भगत, विलास भगत, अनिल निखाडे तसेच सर्व कामगारांच्या उपस्थितीत पार पडत आहे.