ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यात दि. 26 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतमालाचे / फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कालावधीत अथवा यापुढे होणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे / फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे विहित कार्यपध्दतीनुसार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.

सदर निर्देशांच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ पंचनाम्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याबाबतचा निधी मागणी अहवाल विहित नमुन्यात संयुक्त स्वाक्षरीसह त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सर्व तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिका-यांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये