ब्रेकींग – पुन्हा एका इसमावर केली वाघाने शिकार
पोलीस घटनास्थळी दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर – येथील रवींद्र नगर वॉर्ड राहणारा नामदेव मातिराम आत्राम (56)बूथवार सकाळी दहा वा. लाकडे तोडण्या करिता जंगलात गेला होता. सायंकाळी सात वाजले तरीही तो घरी परातला नाही म्हणून घरच्यांनी पोलीस स्टेशन मध्ये हरवलाची रिपोर्ट दिली असता पोलिसांनी याची माहिती वनविभागचे वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिली वन कर्मचारी यांनी सकाळ पासूनच जंगल परिसरात शोध घेतला असता जंगलातील हनुमान मंदिर जवळच मृतक नामदेव आत्राम याचे शरीराचे पोटा पासून अर्धा शरीर खाल्लेलं शव दिसले. पोलिसांना घटना स्थळी बोलावून पंचनामा करून शववीच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
घरच्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मृतक दोन वर्ष अगोदर अपघात झाल्या होता तेव्हा पासून मृतक घरीच राहत होता म्हणून तो जंगलात लाकडे तोडण्या करिता जात असे बुधवारी पन तो गेला होता. करवा रोड चा आत मध्ये कक्ष क्र.494मध्ये जंगल चा आत मध्ये वाघाने मृतकाची शिकार करून 100मीटर पर्यंत फरकटक नेले आणि रात्र भर मृतकाचे भक्षण केले सकाळी वनविभागचे कर्मचारी यांना फक्त शव दिसलें वाघ दिसला नाही या अगोदर ही वाघाने बकरी चारणाऱ्या महिलेला ही शिकार केले होते.
वाघाने आता पर्यंत चार ते पाच लोकांचे रक्तची चव लागली आहे या वाघाला पकडणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर आणखी बळी होऊ शकतात.