ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक आदिवासी कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

अँड.वामनराव चटप यांनी बिल्ला लावून केले स्वागत

चांदा ब्लास्ट

राजुरा तालुक्यातील भेंडवी येथील तीन ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक आदिवासी कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून या सर्वांचे स्वागत केले.
                भेंडवी ग्रामपंचायत सदस्य रमेश भीमराव मडावी, मोहपत दौलत  कुळसंगे, सिताराम कन्नाके या तिन्ही सदस्यांसह आदिवासी नेते सुभाष मंडीगा, लिंबाराम कुमरे, रवि तोडासे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती निळकंठराव कोरांगे, अँड.श्रीनिवास मुसळे, अरूण कष्टी, कपिल इद्दे, मधुकर चिंचोलकर यांचेसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
                  आदिवासींच्या अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी कोणीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत नाहीत. मात्र शेतकरी संघटनेचे नेते आमदार अॅड. वामनराव चटप हे आम्हा आदिवासींचे प्रश्न मोर्चे काढून अथवा विविध माध्यमातून सातत्याने शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या संघर्षपूर्ण कार्याला प्रतिसाद देत आम्ही त्यांच्या पाठीशी उभ राहता निर्णय घेतला असल्याचे यावेळी या आदिवासी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये