सांगा साहेब., चंद्रपूर वरून सायंकाळी कोरपना कसे जायचे
प्रवश्याची गैरसोय ; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर
कोरपना – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर वरून दुपारी चार नंतर कोरपना साठी एक ही थेट बस फेरी नाही.परिणामी प्रवश्याना मुक्कामी राहण्याची पाळी येत आहे.
चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्त कोरपना परिसरातील नियमित जात येत असतात.परंतु वरोरा – आदिलाबाद ही थेट सायंकाळी चार नंतर बस सुटली. की एक ही बस नाही. परिणामी राजुरा किंवा गडचांदूर पर्यंतच्या बस नी यावे लागते. मात्र येथून ही कोरपना साठी सायंकाळी बस फेऱ्या नाही. त्यामुळे प्रवश्याना खासगी ऑटो रिक्षा ने जीव धोक्यात घालून यावे लागत आहे. चंद्रपूर वरून सायकाळी साडे पाच व साडे सहा वाजता या दोन वेळात कोरपना साठी थेट बस फेरी सुरू करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना आपली सर्व कामे आटोपून येणे सोयीचे होईल.यावर राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष देऊन त्वरित प्रवश्यची अडचण दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भोयगाव मार्गे बस सेवा बंदच
चंद्रपूर – भोयगाव – कोरपना ही बस फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र आज गायत बस फेरी पूर्ववत करण्यात आली नाही.त्यामुळे या मार्गावरील प्रवश्यांना मोठी अडचण होत आहे. चंद्रपूर व कोरपना वरून सकाळी साडे आठ, अकरा, सायं पाच वाजता बस सेवा सुरू करणे आवश्यक आहे.