ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताह तथा स्नेह मिलन सोहळा संपन्न

"शिवरायांचा इतिहास आणि सध्याच्या परिस्थितीत राज्यातील आव्हाने" यावर मान्यवरांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

   सर्व प्रकारच्या अज्ञानाच्या श्रृंखला तोडून विकासाचा शाश्वत मार्ग निर्माण व्हावा, मातृसत्ताक स्वराज्य निर्माण व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळा येथील वणी बायपास मार्गावरील साईमंगल कार्यालयात नुकताच सोत्साह संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर हे होते.

      कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते दिक्षा गुरनुले (पांढरकवडा), रुपाली पवार (चित्रपट फेम, मुंबई) राकाँचे वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

       यावेळी प्रमुख मान्यवरांनी “शिवरायांचा इतिहास आणि सध्याची परिस्थितीत राज्यातील आव्हाने” यावर मार्गदर्शन केले.

     सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकाँचे वरोरा शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांनी केले तर आभार भद्रावती तालुकाध्यक्ष राजू बोरकर यांनी मानले.

          कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरोरा – भद्रावती येथील पदाधिकारी गितेश सातपुते, दीपक तुरारे, रवींद्र भोयर, अर्चना आरेकर, उषा आखाडे, उमा नागपुरे, गीता नवले, वंदना काळे, सोनू झाडे, मंदा घागी, ललिता आत्राम, पूनम नवले, लता किन्नाके, शिला कोटनाके, कुंदा करलुके, माधुरी चामटकर, मंजुषा पारशिवे, कोमल गबने, ललिता झाडे, गीता ठक, अर्चना ननावरे, खुशी श्रीरंग, दीपाली बडवाईक, श्रद्धा चतुरकर, वंदना बोरकर, प्रभा कोले, प्रमोद तीवाडे, अखिल कडूकर, मोहन जुनघरे, शेखर भोयर, मंगेश पोले, जीवन बावणे, रमेश कराळे, दिलीप खैरे, दिनेश मोहारे, अजय गायकवाड, रवींद्र ठाकरे, दिलीप महल्ले, संदीप सोमलकर, रामदास नन्नावरे आदींसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये