विकासकामांत योगदान देणार्या पत्रकारांचे कौतूक करायला आखडता हात कां स्लग
व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल म्हस्के यांचा रोखठोक सवाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारदिन सोहळा थाटात ; ज्येष्ठ पत्रकार वझुरकर, समाजसेवक महेश गुल्हाने सन्मानित
आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, दिल्लीचे पत्रकार प्रशांत लिला रामदास यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रत्येक कार्यक्रमातच पत्रकारांना उपदेशाचे डोस पाजण्यात कोणीही आखडता हात घेत नाही. पत्रकारांनी समाजाच्या विकासकामात योगदान द्यावे, आदी सल्ल्याचा पाऊसच पाडल्या जातो. पण समाजसेवकांनी केलेल्या कामांना पत्रकारच प्रसिद्ध देतो. यातून ते विविध पुरस्कारांचे मानकरी ठरतात. नेत्यांनी केलेल्या विकासकामांनाही पत्रकारच प्रसिद्धी देतात. पण त्याच पत्रकारांना उपदेशाचे डोस पाजण्याचे काम पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात केले जाते. ज्यांना समाजकार्याबद्दल शासनाने पुरस्कार दिले त्यांच्या कामांना पत्रकार भरभरून प्रसिद्धी देत असताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरीता पत्रकारदिनाच्या कार्यक्रमातच आखडता हात घेणे वेदनादायी असल्याचे रोखठोक प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिलजी म्हस्के यांनी वर्ध्यात पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात केले.
वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नालवाडीच्या देशमुख लॉनमध्ये पत्रकारदिनाच्या अत्यंत आखीव रेखीव नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त पत्रकारांकरीता कार्यशाळाही आयोजित केली होती. हा कार्यक्रम स्मरणीय ठरला तो व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या रोखठोक भूमिकेने तसेच आयबीएन लोकमतचे दिल्लीचे पत्रकार प्रशांत लिला रामदास यांच्या अनुभवसिद्ध भाषणाने.
या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडिया ‘वर्धा दर्पण’, ‘वर्धा दीप’, ‘वर्धा रक्षक’, ‘वर्धा उद्यम युवा उद्योजक’ व ‘वर्धा बालरंग’ तसेच पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील २८ उत्कृष्ट पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील होते. उद्घाटक म्हणून पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे, न्युज-१८ लोकमतचे ब्युरो चीफ प्रशांत लिला रामदास, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष प्रकाश कथले, विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, प्रमोद राऊत, व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष वरुण पांडे, सरचिटणीस अनुपकुमार भार्गव प्रामुख्याने उपस्थित होते.
पाटोडाचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी त्यांच्या लहानशा गावात केलेल्या विकासकामांचे नियोजन सांगितले तसेच निश्चयाने केलेला गावाचा विकास नेहमीच यशस्वी होतो, असे स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ वझुरकर यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा ‘वर्धा दर्पण’ सन्मान, समाजसेवक महेश गुल्हाणे यांना ‘वर्धा दिप’ सन्मान, पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय देवरकर यांना ‘वर्धा रक्षक’ सन्मान, महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय कला उत्सवातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सक्षम धानकुटे नामक बालकलाकारास ‘वर्धा कलारंग’ उत्कृष्ट बालकलावंत सन्मान तर सेलू येथील समाजसेवक तथा युवा उद्योजक वरुण दफ्तरी यांना ‘वर्धा उद्यम’ युवा उद्योजक सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकारांच्या कार्याचा देखील सन्मान करण्यात आला. यात वर्ध्यातील हितवादचे नरेंद्र देशमुख, झी २४ तासचे मिलिंद आंडे, नीलेश पिंजरकर, वृणाल ढोक, चैतन्य जोशी, सेलू तालुक्यातील लोकमतचे प्रतिनिधी प्रफुल्ल लुंगे, नवभारतचे अभयकुमार बेदमोहता, पुण्यनगरीचे संजय धोंगडे, नवराष्ट्रचे यशवंत वांदिले, तरुण भारतचे भास्कर पिहुल, आर्वी तालुक्यातील प्रमोद एडाखे, नजीर खान, अँड दिलीप ठाकरे, देवळी तालुक्यातील समीर शेख, नरेश ढोकणे, प्रकाश झांजडे, चंद्रशेखर भेंडे, किरण राऊत, कारंजा तालुक्यातील प्रा. अरुण फाळके, प्रा. प्रदीप झुटी, चेतन काळे, रामकृष्ण उर्फ बाबाराव अंबुलकर, सुधाकर बोबडे, हिंगणघाट तालुक्यातील डॉ. रमेश लोंढे, प्रमोद जुमडे, अनिल कडू, महंम्मद रफीक, मलक महंमद नईम आदी पत्रकार बांधवांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुपारच्या सत्रात पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, सचिव एकनाथ चौधरी, जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे, सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, उपाध्यक्ष भारत घवघवे, देवळी तालुका अध्यक्ष गणेश शेंडे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष रवी येणोरकर, आर्वी तालुका अध्यक्ष राजू डोंगरे, पंढरी काकडे, संजय बोंडे, मनिष शर्मा, आनंद धामणकर, अविनाश नागदेवे, सचिन पोफळी, राजू कोहळे, आशिष इझनकर, मंगेश काळे यांनी अथक परिश्रम घेतले. पत्रकार दिन सोहळ्याला शहरातील तसेच ग्रामीण भागातील पत्रकार, राजकीय मंडळीसह अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.