ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित सुकारे यांनी सरकारला दिला चार दिवसाचा अल्टिमेट…

सातव्या दिवशीही सरकारने दखल घेतली नाही...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यासाठी ७ डिसेंबर पासुन चिमुर क्रांती भुमीत अजित सुकारे व अक्षय लाजेवार, या दोन ओबीसी कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या टप्प्यात सुरू केले.

या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अक्षय लांजेवार यांची सहाव्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सात दिवसांपासून लोकप्रतिनिधीकडुन व सरकारकडून ओबीसी च्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आक्रोश तयार झाला आहे. चिमुर क्रांती भुमीत ओबीसी क्रांती चिघळू शकते.

चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनास राज्य सरकारने आश्वासनाची पाने पुसल्याने ओबीसी क्रांतीचा दुसरा टप्पा म्हणून चिमुर क्रांती भुमीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.या आंदोलन प्रसंगी शासणाचे लक्ष वेधण्यासाठी थाळी वाजवा आंदोलन, भिक मांगो आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तरीपण विरोधी पक्षनेते व सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अजित सुकारे यांनी आता सरकारला चार दिवसाचा अल्टिमेट देतोय.

अजित सुकारे यांची प्रतिक्रिया “सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.तरी लोकप्रतिनिधी व सरकारने ओबीसी च्या मागण्यांची दखल घेतली नाही. विरोधीपक्षातील लोकप्रतिनिधी यांनी अधिवेशनात सुद्धा मुद्दा उपस्थित केला नाही.सरकारला चार दिवसाचा अल्टिमेट देत आहे.

जर चार दिवसात ओबीसी मागण्या संदर्भात तातडीने पाऊले उचलली नाही तर वैद्यकीय उपचार घेणार नाही.
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी, झाड झडूले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बाम बनेगे नाव लगेगे किनारे, या भजनाने भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिमूर क्रांती भूमी पेटून उठली त्याप्रमाणेच ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा चिमूर क्रांती भूमी पेटून उठेल असे या ठिकाणी मी इशारा देतोय…

अजित सुकारे, अन्नत्याग आंदोलनकर्ते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये