ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनॉर्थ चिमुरात केला रस्ता रोखो..

आंदोलकांना केले पोलिसांनी स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

     राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून. अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन. भीक मांगो आंदोलन शाशनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले

      राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूरचया वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली. दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूरयेथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

         राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन. भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले. आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी यावेळी दिला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये