ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिकाची नोंदणी करूनही हमीभावाने खरेदी होईना

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी उदासीन..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

130.. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

 शेतकऱ्यांच्या मालाला कमीत कमी उत्पादन आधारभूत मूल्य मिळावे यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले परंतु सदर हमीभाव केंद्र विहित मुदतीत सुरू राहिले आणि त्याच मुदतीवर सदरील पोर्टल बंद झाले त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन सुद्धा हमीभाव केंद्रावर खरेदी केल्या गेले नाही त्यामुळे नोंदणी करून सुद्धा तालुक्यातील 130 शेतकऱ्यांच्या आशेवर पुरते पाणी फिरले आहे.

 सविस्तर वृत्त असे की केंद्रावरील खरेदीची मुदत संपून दोन महिन्याच्या वर कालावधी लोटला. शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नोंदणी केलेल्या मात्र केंद्रावर विक्री न करता आलेल्या तालुक्यातील 130सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची हमीदर मिळण्याची आशा मावळली आहे.

 तालुक्यातील पेरणी योग्य क्षेत्रफळापैकी झालेल्या खरीप हंगामात 14,457 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, खासगी बाजारपेठेत ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांच्या आतच भाव अडकले. केंद्र सरकारच्या नाफेड अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी-विक्री संघ आणि इतर तीन खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री करण्यासाठी १०२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त 9 00 शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी केले. उर्वरित 124 आणि 50 शेतकरी रद्द झालेले असे एकूण 174 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. येथील हमीभाव केंद्रावर केवळ तेरा हजार 934 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. नोंदणी करूनही खरेदी न झालेल्या यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मुदतवाढीनंतरही हाती निराशा…

बारदाना नसल्याने महिनाभर हमीभाव केंद्रावरील काटा महिनाभर बंद होता. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन खरेदी पूर्ववत केली खरी, मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन खरेदीची मुदत संपली. शासनाने पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली. परंतु, तरीही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करता आले नाही.

मग ही उठाठेव कशासाठी ?

शासनाने शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील, यासाठी हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वास्तवात नोंदणी करूनही शेतमालाची खरेदी होत नसेल तर ही उठाठेव कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत असून, नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या धोरणासंदर्भात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे

सोयाबीनचे काय करावे….

हमीभावाने खरेदी केल्यास दोन • पैसे पदरात पडतील, यासाठी शासनाच्या नियमात नोंदणी केली. मात्र, खरेदी बंद केल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत.

खासगी बाजारात अपेक्षित भाव नाहीत अन् घरातील सोयाबीनची हमीभावाने खरेदी नाही. त्यामुळे विक्री कुठे करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सोयाबीनची नोंदणी करूनही खरेदी न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात तूर नोंदणीचे आवाहन केले जात असल्याने शेतकऱ्यांनी याकडे सपशेल पाठ फिरवल्याची स्थिती दिसून येत आहे. दोन महिन्यांत केवळ नाममात्र शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे पुढे आले आहे.

      कर्जमाफी शेतकऱ्यांना वीज बिल मोफत, तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून हमीभाव असे बरेच काही आश्वासन शेतकऱ्यांसाठी शासनाकडून देण्यात येते परंतु त्याची स्थानिक पातळीवर कितपत पूर्तता होते याकडे सुद्धा प्रशासनाने तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. नोंदणी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नसेल तर हमीभाव केंद्राचा अट्टाहास कशासाठी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

     डॉक्टर रामप्रसाद शेळके..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये